मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Maharashtra Politics | विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये (Winter Session) सभागृहात बोलताना छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) हे धर्मवीर (Dharmaveer) नव्हते, ते स्वराज्य रक्षक (Swaraj Rakshak) होते असे विधान केले होते. छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या विधानाचे पडसाद अद्यापही उमटताना दिसत आहेत. भाजप (BJP), शिंदे गट अजित पवार यांच्यावर टीका (Maharashtra Politics) करत आहे. तर त्याला राष्ट्रवादी (NCP), शिवसेना (Shivsena) नेत्यांकडून प्रत्युत्तर दिले जात आहे. यातच आता भाजप आमदार आशिष शेलार (MLA Ashish Shelar) यांनी ठाकरे गट (Thackeray Group) आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे.
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
आशिष शेलार यांनी एकामागून एक तीन ट्विट करत मागील काही दिवसांत घडलेल्या घडामोडींवरुन शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेचा चांगलाच समाचार घेतला आहे. छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते- अजित पवार, औरंगजेब क्रूर, हिंदूद्वेष्टा नव्हता-जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad), दाऊदशी व्यवहार करणाऱ्या नवाब मलिकांच्या (Nawab Malik) पक्षाच्या नेत्यांची ही विधाने महाराष्ट्राने (Maharashtra Politics) हलक्यात घ्यावी का? ही एक ‘औरंगजेबी’ चाल तर नाही ना? असा सवाल शेलार यांनी केला आहे.
◆छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते- मा.अजित पवार
◆औरंगजेब क्रूर, हिंदूद्वेष्टा नव्हता – मा.जितेंद्र आव्हाड
◆दाऊदशी व्यवहार करणाऱ्या नवाब मलिकांच्या पक्षाच्या नेत्यांची ही विधाने महाराष्ट्राने हलक्यात घ्यावी का?
◆ही एक "औरंगजेबी" चाल तर नाही ना?
1/3— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) January 3, 2023
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली तीनचाकी सरकार आल्यापासून नियोजनबद्ध कट रचलाय? म्हणूनच छत्रपती संभाजीराजे धर्मवीर नव्हते हे सांगणाऱ्या अजित पवार यांची आज सामनाने पाठराखण केलेय? या कटाची स्क्रिप्ट प्रभादेवीच्या कार्यालयात बसून ‘अण्णाजी पंत’ यांनी लिहीलेय? अशा प्रश्नांची सरबत्ती आशिष शेलार यांनी ट्विटवरुन केली आहे.
◆मा. उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तीन चाकी सरकार आल्यापासून नियोजनबध्द कट रचलाय?
◆ म्हणूनच छत्रपती संभाजीराजे धर्मवीर नव्हते हे सांगणाऱ्या अजित पवार यांची आज सामनाने पाठराखण केलेय?
◆या कटाची स्क्रिप्ट प्रभादेवीच्या कार्यालयात बसून "अण्णाजी पंत" यांनी लिहीलेय?
2/3— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) January 3, 2023
काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी दोघे मिळून शिवसेनेला ‘टकमक टोकाकडे’ घेऊन जात आहेत! आपल्या राजकीय स्वार्थासाठी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याचा अपमान करणाऱ्या या सगळ्यांचा जनतेकडून कडेलोट अटळ आहे, असा इशार आशिष शेलार यांनी दिला आहे.
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
◆ काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोघे मिळून शिवसेनेला "टकमक टोकाकडे" घेऊन जात आहेत !
◆ आपल्या राजकीय स्वार्थासाठी
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याचा अपमान करणाऱ्या या सगळ्यांचा जनतेकडूनच कडेलोट अटळ आहे.
3/3— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) January 3, 2023
Web Title :- Maharashtra Politics | bjp ashish shelar criticised shivsena thackeray group congress and ncp over chhatrapati sambhaji maharaj statement
Fawad Khan | ‘द लीजेंड ऑफ मौला जट्ट’च्या भारतातील प्रदर्शनावर फवाद खानने दिली प्रतिक्रिया; म्हणाला…