मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन– Navneet Ravi Rana On CM Uddhav Thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Tackeray) यांनी हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) पूर्ण वाचण्याची गरज नाही, त्यांनी त्यातील फक्त चार ओळी तोंडपाठ सांगाव्या. उद्धव ठाकरे हे फक्त बाळासाहेबांच्या विचारावर मुख्यमंत्री झाले आणि त्यांचा मुलगा मंत्री झाला, मला वाटतं लाभ घेण्याची सवय त्यांच्या पिढीला आहे असं म्हणत अमरावतीच्या (Amravati) खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकेंरवर निशाणा साधला. रवी राणा (Ravi Rana) आणि नवनीत राणा (Navneet Rana) मुंबईत आले असून त्यांनी पत्रकार परिषद घेत ‘मातोश्री’ वर (Matoshree) जाणार असल्याचं सांगितलं आहे.
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
आता काही निवडणुका (Election) नाहीत त्यामुळे हा काही स्टंट नाही,
जर निवडणुकीच्या तोंडावर असं काही केलं असतं तर स्टंट (Stunt) समजला गेला असता.
मी त्यांच्याच उमेदवारांना पाडून निवडून आले, त्यामुळे मला कोणी शिकवू नये. 16 – 16 तास काम केल्यानंतर मला निवडून दिलं असल्याचं नवनीत राणा (Navneet Ravi Rana On CM Uddhav Thackeray) म्हणाल्या.
उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यापासून महाराष्ट्रात हाहाकार माजला आहे. शेतकऱ्याची परिस्थिती खराब आहे.
बेरोजगारी (Unemployment) वाढली आहे. विकास थांबला आहे.
त्यामुळे त्याचं विघ्न संपवण्यासाठी त्यांनी हनुमान चालिसा वाचणं गरजेचं असल्याचं म्हणत नवनीत राणांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.
दरम्यान, मला असं वाटतं, की उद्धव ठाकरे हिंदुत्व विसरले आहेत आणि हिंदुत्वाची दिशा सोडून ते दुसऱ्याच दिशेला जाऊन या महाराष्ट्राचं वाटोळं करत आहेत, असंही राणा म्हणाल्या.
Web Title :- Navneet Ravi Rana On CM Uddhav Thackeray | MP Navneet ravi rana said we will read hanuman chalisa in front of matoshree