उस्मानाबाद : सरकारसत्ता ऑनलाइन– MIM चे खासदार इम्तियाज जलील (MP Imtiaz Jaleel) यांनी राष्ट्रावादीला (NCP) युतीची (Alliance) ऑफर दिल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. भाजपचे नेते (BJP Leader) महाविकास आघाडीवर (Maha Vikas Aghadi) टीका करत आहेत. यावरुन आरोप – प्रत्यारोप होत असताना भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी यामध्ये उडी घेतली आहे. मात्र, महाविकास आघाडी आणि एमआयएम युतीवर बोलताना त्यांची जीभ घसरली. नितेश राणे (Nitesh Rane) यांनी राष्ट्रवादीवर टीका केली आहे.
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
आमदार नितेश राणे (Nitesh Rane) हे तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी तुळजापूरमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी तुळजाभवानी देवीचे सहकुटुंब दर्शन घेऊन देवीचा धार्मिक कुलाचार केला. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर (MVA Government) टीका केली.
नितेश राणे म्हणाले, लग्नाचा प्रस्ताव एमआयएमने दिला आहे, तो स्विकारावा का नाही हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांच्या घरात कोण कुणासोबत झोपतंय हा आमचा प्रश्न नसून भाजप स्वबळावर 2024 मध्ये सत्ता स्थापन करेल, असे वक्तव्य राणे यांनी केले. तसेच उस्मानाबादचे (Osmanabad) धाराशिव आणि औरंगाबादचे (Aurangabad) संभाजीनगर नामकरण करण्याची धमक देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यातच आहे. भाजप सरकार (BJP Government) सत्तेत आल्यावर आम्ही हे करुन दाखवू, असेही ते म्हणाले.
नितेश राणे पुढे म्हणाले, दाऊदची बी टीम महाराष्ट्राच्या सरकारमध्ये राज्य करते.
म्हणून नवाब मलिकांचा (Nawab Malik) राजीनामा (Resignation) घेतला जात नाही.
मलिक यांचा राजीनामा घेतला तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना त्याचे दाऊदला उत्तर द्यावे लागेल, असेही ते म्हणाले.
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
Web Title :- Nitesh Rane | BJP leader and mla nitesh ranes obscene statment on discussion of ncp and mim alliance