नागपूर : सरकारसत्ता ऑनलाइन– Sanjay Raut | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar) यांच्यावर ईडीने (ED) कारवाई केली. केलेल्या या कारवाईमुळे राज्यातील राजकारण तापलेलं आहे. महाविकास आघाडीतील (Maha Vikas Aghadi) नेत्यांनी या कारवाईच्या पार्श्वभूमीवर भाजपवर जोरदार टीका केली आहे. अशातच शिवसेनेचे (Shivsena) नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पाटणकरांवर झालेल्या कारवाईनंतर मुख्यमंत्र्यांशी काय बोलणं झालं?, याबाबत सांगितलं आहे.
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माझं यासंदर्भात बोलणं झालं असून याबाबत मी जगाला कशाला सांगू. हा आमच्या घरातील विषय आहे मात्र एका विषयावर उद्धव ठाकरे आणि माझं एकमत झालं ते म्हणजे या दमनशाहीविरोधात लढायला पाहिजे. या दबावापुढे लढायला पाहिजे आणि झुकायचं नाही, असं संजय राऊतांनी (Sanjay Raut) सांगितलं.
महाविकास आणखी बळकट झाली- राऊत
ईडीच्या कारवाईमुळे महाविकास आघाडी आता आणखी बळकट झाली आहे. काही फटी पडल्या होत्या, संशयाला काही प्रमाणात जागा होती पण आता ईडीच्या कारवाईमुळे तिन्ही पक्ष एकत्र आले असून सरकार आता आणखी मजबूत (Strong) झालं असल्याचं (Sanjay Raut) राऊत म्हणाले.
दरम्यान, आम्ही पुरावे (Evidence) दिले तर कारवाई होत नाही.
मात्र तेच भाजपच्या (BJP) नेत्यांनी केंद्रीय यंत्रणांना दिलेली चिटोरीसुद्धा पुरावे म्हणून ग्राह्य धरले जातात.
महाविकास आघाडीमधील नेत्यांच्या संपत्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं मग भाजपचे नेते भीक मागत आहेत का?, असा सवाल संजय राऊतांनी केला.
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
Web Title :- Sanjay Raut | CM uddhav thackeray and sanjay raut discussion over phone after ed action against shridhar patankar