मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन– Shivsena MP Sanjay Raut | ‘गुवाहाटीला गेलेले आता जिवंत प्रेतं आहेत आणि ही जिवंत प्रेतं आता मुंबईत
येतील, तेव्हा त्यांना थेट शवागृहात पोस्टमोर्टमसाठी पाठवू,’ असं वक्तव्य शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी केलं होतं. त्यानंतर राऊत आणि बंडखोर आमदारांमध्ये राजकीय शीतयुद्ध रंगलं आहे. असं वक्तव्य केल्याने बंडखोर आमदार चांगलेच संतापले असून मोठा तणाव निर्माण झालाय. यानंतर संजय राऊत यांनी आणखी एक ट्वीट केल्याने आणखी वातावरण तापण्याची शक्यता आहे.
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
“अगतिकता एक प्रकारचा मृत्यूच आहे आणि अगतिक लोक चालते फिरते मृतदेहच असतात”. असं ट्वीट संजय राऊत यांनी केलं आहे. राऊत यांच्या नव्या ट्वीटमुळे आणखी वाद वाढण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे.
— Sanjay Raut (@rautsanjay61) June 28, 2022
दोन दिवसांपुर्वी शिवसेनेच्या मेळाव्या दरम्यान बोलताना संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांवर हल्लाबोल केला. गुवाहाटीहून 40 आमदारांचे मृतदेह मुंबईत येतील व त्यांचे शवविच्छेदन होईल, असं विधान राऊत यांनी केले होतं. त्यावरून मोठा वाद सुरू झाला. त्यावर संध्याकाळी राऊत यांनी सारवासारव केली. आमदारांनी आत्मा विकल्याने जे उरले ते केवळ त्यांचे जिवंत शरीर मृतदेहासारखेच आहे. आता त्यांचे विधानभवनात विच्छेदन होईल, असा माझ्या विधानाचा अर्थ असल्याचं स्पष्टीकरण राऊत यांनी दिलं.
Web Title :- shivsena leader and mp sanjay raut eknath shinde mahavikas aghadi maharashtra political crisis
Gold Silver Price Today | जाणून घ्या सोने आणि चांदीचे दर
Maharashtra Political Crisis | ‘भाजप वेट अँड वॉच भूमिकेत’; सुधीर मुनगंटीवार यांची माहिती
Maharashtra Monsoon Update | राज्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण, तर काही ठिकाणी जोर’धार’