मुंबई :सरकारसत्ता ऑनलाईन – राजापूर तालुक्यातील बारसू येथील प्रस्तावित रिफायनरीवरुन मोठा वाद सुरु झाला आहे. प्रकल्पाच्या (Barsu
Refinery Project) माती परीक्षणाला स्थानिकांचा विरोध सुरु आहे. पोलीस बळाचा वापर करुन स्थानिकांचा विरोध मोडून मंगळवारी ड्रिलिंगचे काम
सुरु करण्यात आले. यावेळी 110 आंदोलकांना ताब्यात घेतले असून, याचे तीव्र पडसाद आता राजकीय वर्तुळात (Maharashtra Political News)
उमटताना पाहायला मिळत आहे. यावरुन शिंदे-ठाकरे गटाकडून आरोप-प्रत्यारोप सुरु असताना उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी
बुधवारी (दि.26) राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांची भेट घेतली. यानंतर उदय सामंत (Uday Samant) यांनी बैठकीत
झालेल्या चर्चेसंदर्भात माहिती माध्यमांना दिली.
उदय सामंत (Uday Samant) म्हणाले, खरंतर ही भेट नाट्य परिषदेसंदर्भात (Natya Parishad) घेतली होती. मात्र, या बैठकीवेळी दोघांमध्ये बारसू येथील प्रस्तावित रिफायनरी आणि त्याला सुरु असलेल्या विरोधावर चर्चा झाली. ही राजकीय बैठक नव्हती. बारसूमधील सध्याची परिस्थिती काय आहे, तिथे काल काय परिस्थिती निर्माण झाली होती याची माहिती मी शरद पवार यांना दिल्याचे सामंत यांनी सांगितले.
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
सामंत पुढे म्हणाले, मंगळवारी आंदोलक महिलांना अटक केली होती. मात्र, त्यांना आता सोडून दिलं आहे. प्रशासन आणि शासनाने शेतकऱ्यांशी बोललं पाहिजे. शासन बोलण्यास तयार आहे. जिल्हा प्रशासनाने तेथील 300 ते 350 लोकांसोबत बैठक आयोजित केली आहे. त्यांच्याशी चर्चा करुन त्यांना विश्वासात घेऊन पुढील कार्यवाही केली जाईल असे सामंत यांनी यावेळी सांगितले.
मला एक गोष्ट याठिकाणी नमूद करायची आहे की, जसे या रिफायनरीला विरोध करणारे विरोधक आहेत तसेच समर्थक देखील आहेत. तसेच याठिकाणी सर्वेक्षण (Ratnagiri Refinery Survey) नाही तर केवळ माती परीक्षण (Soil Testing) सुरु केले आहे. त्यानंतर याठिकाणी प्रकल्प आणायचा की नाही हे कंपनी ठरवणार आहे. शेतकऱ्यांनी शासनाला सहकार्य करावं. शेतकऱ्यांचे गैरसमज दूर करण्यास शासन कटीबद्ध आहे. यासंदर्भात शरद पवार यांच्यासोबत चर्चा झाल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.
Web Title :- Uday Samant | uday samant meets sharad pawar on barsu refinery protest