नाशिक : सरकारसत्ता ऑनलाइन टीम – नाशिक येथे ता. 26, 27, 28 मार्च रोजी साहित्य संमेलन ( akhil bhartiya sahitya sammelan ) होणार होते. ते आता स्थगित करण्यात आले आहे, असे साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी सांगितले. याबाबत महामंडळाने पत्रक प्रसिद्ध केले आहे. कोरोनाचे संक्रमण पुन्हा वाढल्याने संमेलन स्थगित केल्याची माहिती ठाले पाटील यांनी दिली.
स्थगित संमेलनाचे अध्यक्ष, मावळते अध्यक्ष आणि सर्व निमंत्रित साहित्यिक यात बदल केला जाणार नाही. हे संमेलन मे 2021 च्या आत स्वागत मंडळाने घ्यावे, अशी महामंडळाची अपेक्षा आहे. ऑनलाइन उपक्रमांचं स्वागत करू. मात्र, संमेलन ऑनलाइन घेता येणार नाही, असे ठाले पाटील यांनी सांगितलं.
भविष्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर संमेलन घेण्याबाबत विचार केला जाईल, असे ठाले पाटील यांनी सांगितलं आहे. राष्ट्रवादीचे नेते व संमेलनाचे स्वागत अध्यक्ष छगन भुजबळ यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती, तेव्हापासून हे संमेलन होणार की नाही, याची चर्चा सुरू होती.
संमेलन ऑनलाइन घेता येणार नाही. ऑनलाइन संकल्पनेत साहित्य संमेलन बसत नाही.
त्यामुळे ते घेता येणार नाही, असे मला वाटतं.
ऑनलाइनमध्ये एखादा परिसंवाद, चर्चा, भाषण इत्यादी गोष्टी करता येतील.
ऑनलाइन उपक्रमांचं स्वागत करू.
मात्र, संमेलन ऑनलाइन घेता येणार नाही, असे ठाले पाटील यांनी सांगितलं.
- PM मोदींचा फोटो हटवा; निवडणूक आयोगाचा आदेश
- PM मोदींचा फोटो हटवा; निवडणूक आयोगाचा आदेश
- ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याचा ठराव विधिमंडळात संमत करून केंद्राला शिफारस करा’ : खा. गोपाळ शेट्टी