नवी दिल्ली : केंद्र सरकारने लोकांना मोठा दिलासा देत देशात वन नेशन, वन रेशन कार्डची Ration Card सुरुवात केली आहे. सध्या रेशन कार्डात नाव टाकणे आणि काढण्याचे काम वेगाने सुरू आहे. ज्यामध्ये अनेक ठिकाणाहून फसवणुकीची वृत्त सुद्धा येत आहेत. अशी प्रकरणे सुद्धा समोर येत आहेत, ज्यामध्ये मृत व्यक्तीच्या नावावर सुद्धा लोक बनावट प्रकारे रेशनचा लाभ घेत आहेत.
संजय राऊत शिवसेनेत आहेत की राष्ट्रवादीत ? काँग्रेसचा संतप्त सवाल
परंतु, आता अशी फसवेगिरी रोखण्यासाठी सरकारने कठोर नियम बनवले आहेत. ज्यामध्ये जर एखादी व्यक्ती बनावट प्रकारे रेशन कार्डात आपले नाव टाकत असेल किंवा रेशन कार्डमध्ये मृत व्यक्तीच्या नावावर सुद्धा रेशनचा लाभ घेत असेल तर अशा लोकांवर कठोर कारवाई होऊ शकते. अशा व्यक्तीला कारावास होऊ शकतो.
‘दूध का दूध, पानी का पानी करावं’ – गृहमंत्री अनिल देशमुख
रेशन कार्ड बनवण्यासाठी काही नियम आणि अटींचे पालन करणे आवश्यक आहे. आता तशा लोकांनाच रेशन देण्याची तरतूद आहे, ज्यांना वास्तवात त्याचा अधिकार आहे. अनेक लोक दारिद्रय रेषेच्या खाली किंवा अंत्योदय योजनेसाठी चुकीची कागदपत्र देतात आणि बनावट प्रकारे आपले रेशन कार्ड बनवतात. परंतु, फुड सिक्युरिटी अॅक्ट अंतर्गत बनावट रेशन कार्ड बनवणे एक दंडणीय गुन्हा आहे. जर कुणी दोषी आढळले, तर त्यास पाच वर्षांचा कारावास आणि दंड द्यावा लागू शकतो.
संजय राऊतांच्या ‘त्या’ विधानावर नाना पटोले यांनी दिली पहिली प्रतिक्रिया, विषय बनू शकतो ‘गंभीर’
याशिवाय आता कुणी व्यक्ती रेशन कार्ड Ration Card बनवण्यासाठी अधिकार्याला लाच देत असेल किंवा अधिकारी लाच घेऊन एखाद्या व्यक्तीला बनावट रेशन कार्ड बनवून देत असेल तर त्यांच्या विरूद्ध कठोर कारवाई होऊ शकते. त्यास जेल आणि दंड द्यावा लागू शकतो.
नाना पटोले संतप्त; म्हणाले – ‘फडणवीस म्हणजे काय NIA आहे का?
केंद्र सरकारने संपूर्ण देशात वन नेशन वन रेशन कार्ड Ration Card पोर्टेबिलिटी सुविधा सुरू केली आहे. ज्याच्याशी जवळपास देशातील सर्व राज्य जोडली गेली आहेत. या नव्या नियमानुसार कुणीही कार्डधारक देशाच्या कोणत्याही कोपर्यात आपले रेशन घेऊ शकतो.
‘केरळचे लोक सुशिक्षित असल्याने भाजपला मतं मिळत नाही’, भाजप नेत्याचे वक्तव्य
मोठी बातमी ! अखेर राऊतांनी फडणवीस मुख्यमंत्री न होण्याचे सांगितलं कारण; म्हणाले…
परमबीर सिंग, गृहमंत्री देशमुख यांच्यातील वाद उच्च न्यायालयात, 30 मार्चला सुनावणी
सरकारी कर्मचार्यांना आठवड्यात मिळेल 3 दिवसांची सुट्टी ? जाणून घ्या केंद्र सरकारचे उत्तर
‘दूध का दूध, पाणी का पाणी करावं’ – गृहमंत्री अनिल देशमुख