मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – महाराष्ट्रात सध्या शिवसेना, काँग्रेस, आणि राष्ट्रवादी काँग्रेस मिळून तिन्ही पक्षाचे सरकार आहे. विशेष म्हणजे काही मुद्यावर या पक्षांमध्ये मतभेद देखील दिसून येतात. आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज संस्था आणि विधानसभा (Assembly) निवडणुका हे एकत्र लढणार का? असा प्रश्न सर्वांपुढे येत होता. मात्र, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी काँगेसची भूमिका स्पष्ट करत स्थानिक स्वराज संस्था आणि विधानसभा (Assembly) निवडणुका या स्वबळावरच लढणार असल्याचं पटोले यांनी म्हटलंय.
Nagar : ‘महापौरपदाच्या निवडणुकीत तटस्थ राहू, आता राष्ट्रवादीचा पाठिंबा नको’ – भाजपचे पदाधिकारी
आगामी निवडणुकांसाठी काँग्रेसचा स्वबळाचा नारा नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे.
नाना पटोले (Nana Patole) म्हणाले, महाराष्ट्रात काँग्रेस हा सध्या ४ थ्या क्रमांकाचा पक्ष आहे , मात्र, २०२४ मध्ये पहिल्या क्रमांकाचा पक्ष होईल.
असे देखील नाना पटोले यांनी म्हटलं आहे, तसेच महाविकास आघाडी सरकार हे केवळ भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आलं आहे.
तेही काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींनी कॉमन मिनिमम प्रोग्रॅमची आखणी केल्यानंतर सरकार स्थापन झाले.
म्हणून येत्या काळात सरकारच्या योजना जनतेला पाहायला मिळतील असे पटोले म्हणाले.
दरम्यान, पुढे नाना पटोले (Nana Patole) म्हणाले, कोरोना हा देशाला आर्थिक डबघाईला आणणारा आजार आहे.
हे सगळ्यात आधी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सांगितले होते.
या आजाराला गांभीर्याने घेण्याचा सल्लाही त्यांनी दिला होता.
परंतु, भाजपच्या काही लोकांनी त्यांना समाजमाध्यमांवर वेड्यात काढले.
आता परिस्थिती आपण पाहातच आहोत, असं कोरोनाच्या परिस्थितीला मोदी सरकारच जबाबदार असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केले आहे.
Also Read:-
‘सीरम’ने मागितली कायदेशीर कारवाईतून सूट, म्हटले – ‘सर्वांसाठी असावा एकच नियम’
’तुझा पती माझा आहे, तुला मरावे लागेल’…म्हणत माजी आमदाराच्या सुनेवर तुटून पडली मुलगी
मंगलदास बांदल यांच्याविरूध्द आणखी एक फसवणूकीचा गुन्हा, इतरांचा देखील समावेश
50000 ची लाच घेताना उत्पादन शुल्कच्या निरीक्षकास अॅन्टी करप्शनकडून अटक
Covid-19 Vaccine : कोविड व्हॅक्सीन घेतल्यानंतर ‘ही’ 7 कामं अजिबात करू नका, जाणून घ्या
Kadha In Summer : उन्हाळयात काढा पिण्याने नुकसान होऊ शकते का? जाणून घ्या