मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) – महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) पदभार स्वीकारल्यानंतर अॅक्टीव्ह मोडमध्ये आले आहेत. अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटांचे शूटिंगही बंद पाडू असा इशारा पटोले यांनी दिल्यानंतर फडणवीस यांनी पटोले यांच्यावर निशाणा साधला होता. यानंतर नाना पटोले यांनी, माझे मित्र देवेंद्र फडणवीसांचे वक्तव्य फारसे मनावर घेण्याचे कारण नाही, असा टोला लगावला आहे. नाना पटोले आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगलेच वाकयुद्ध रंगल्याचे पहायला मिळत आहे.
सत्तापक्ष का नेता ना हुआ तो क्या हुआ विपक्ष का नेता तो हुआ, याच नकारात्मक भूमिकेतुन माझे मित्र देवेंद्र फडणवीस ( @Dev_Fadnavis ) अलिकडे वक्तव्य करीत असतात. त्यांचे वक्तव्य फारसे मनावर घेण्याचे कारण नाही. पेट्रोल आणि गॅस दरवाढी संदर्भात मी जनतेच्या मनातील असंतोषाला वाचा फोडली आहे. pic.twitter.com/RpyzyB4WFN
— Nana Patole (@NANA_PATOLE) February 19, 2021
नाना पटोले (Nana Patole) यांनी ट्विट करुन म्हटले आहे की, सत्तापक्ष का नेता न हुआ तो क्या हुआ विपक्ष का नेता तो हुआ, याच नकारात्मक भूमिकेतून माझे मित्र देवेंद्र फडणवीस अलीकडे वक्तव्य करीत असतात. त्यामुळे त्यांचे वक्तव्य फारसे मनावर घेण्याचे कारण नाही. पेट्रोल आणि गॅस दरवाढी संदर्भात मी जनतेच्या मनातील असंतोषाला वाचा फोडली आहे.
टीव-टीव करणारे अभिनेते जनतेच्या प्रश्नावर गप्प का ?
नाना पटोले (Nana Patole) यांनी पुढे म्हटले आहे की, एरवी छोट्या-छोट्या गोष्टींवर टीव-टीव करणारे अभिनेते जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर गप्प का ? ही जनतेच्या मनातील भावना मी व्यक्त केली तर भाजप नेत्यांना एवढ्या मिरच्या झोंबण्याचे कारण काय ? असा प्रश्न नाना पटोले यांनी यावेळी विचारला आहे.
दरम्यान, काँग्रेस सरकार असताना पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्यावर ट्विटवर ट्विट करणारे अभिनेते अक्षय कुमार, अमिताभ बच्चन यांच्यावर नाना पटोले यांनी टीका केली होती.
अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटाचे शूटिंग महाराष्ट्रात होऊ देणार नाही,
तसेच त्यांच्या सिनिमांचे प्रदर्शन देखील राज्यात होऊ देणार नाही,
असा इशारा नाना पटोले यांनी भंडारा येथे बोलताना दिला होता.