मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकानं भरलेली गाडी सापडल्यानंतर घडलेल्या घडामोडीने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण स्फोटक बनलं आहे. स्फोटक प्रकरणात पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली. यामुळे महाविकास आघाडीचे सरकार अडचणीत आले आहे. त्यातच माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बने एकच खळबळ उडाली आहे. परमबीर सिंह यांच्या पत्रानंतर भाजप आक्रमक असताना आता महाविकास आघाडी सरकारमधील तीन पक्षांमध्ये ऑल इज वेल नसल्याचे दिसून येत आहे.
शरद पवार आणि अमित शहांमध्ये गुप्त बैठक?, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ, चर्चांना उधाण
शिवसेना ने महाराष्ट्र के गृह मंत्री के चाल-चलन पर शक जाहिर किया है।
राष्ट्रवादी कांग्रेस के मुखिया कह चुके है कि गृह मंत्री के भविष्य का फ़ैसला मुख्यमंत्री करें।
मुख्यमंत्री शिवसेना के हैं और मौन साधे हैं।
फिर एक्शन लेने से मुख्यमंत्री को किसने रोक रखा है ?#AnilDeshmukh— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) March 28, 2021
शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊतांनी रोखठोकमधून राष्ट्रवादीचे नेते आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर बाण सोडले आहेत. पोलीस आयुक्तांनी चुका केल्या, त्यामुळे त्यांना जावे लागले असे एक विधान करताच परमबीर सिंह यांनी देशमुखांनी 100 कोटींच्या वसुलीचे टार्गेट दिल्याचे पत्र लिहून स्फोट केला. हे टार्गेट कोणाला दिले तर मनसुख हिरेन प्रकरणात अटकेत असलेल्या सचिन वाझे यांना. अनिल देशमुख यांनी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी विनाकारण पंगा घेतला. गृहमंत्र्याने कमीत कमी बोलावे. ऊठसूट कॅमेऱ्यासमोर जाणे व चौकशीचे जाहीर आदेश देणे बरोबर नाही. ‘सौ सोनार की एक लोहार की’ असे वर्तन गृहमंत्र्यांचे असले पाहिजे. पोलीस खात्याचे नेतृत्तव फक्त ‘सॅल्यूट’ घेण्यासाठी नसते. ते कणखर नेतृत्व देण्यासाठी असते. हा कणखरपणा प्रामाणिकपणातून निर्माण होत असतो हे विसरुन कसे चालेल ? असा टोला संजय राऊत यांनी गृहमंत्र्यांना लगावला आहे.
शरद पवार आणि अमित शहांमध्ये गुप्त बैठक?, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ, चर्चांना उधाण
संजय राऊत यांच्या विधानामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये Congress वाकयुद्ध रंगले आहे. कुणी मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करु नये, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. शिवसेना -राष्ट्रवादीच्या या वादात काँग्रेसने congress उडी घेतली आहे. काँग्रेसचे congress माजी खासदार संजय निरुपम यांनी शिवसेनेला लक्ष्य केले आहे. शिवसेनेनं महाराष्ट्रात गृहमंत्र्यांच्या वर्तवणुकीवर शंका उपस्थित केली आहे. गृहमंत्र्यांच्या भविष्याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, असं शरद पवार म्हणाले होते. मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे आणि त्यांनी मौन धारण केले आहे. त्यांना कारवाई करण्यापासून कोणी रोखलं आहे ? असा सवाल संजय निरुपम यांनी केला आहे.
Sanjay Raut : … म्हणून 12 आमदारांची अद्याप नियुक्ती नाही
Mann ki Baat : ‘देशाने वाजवलेल्या टाळ्या आणि थाळ्या कोरोना योद्ध्यांच्या हृदयाला स्पर्श करुन गेल्या’
Sanjay Raut : अनिल देशमुखांना अपघाताने गृहमंत्रिपद मिळाले
होय, दीपाली चव्हाणांना वाईट वागणूक मिळत होती, वन्यजीव रक्षकाचा दावा
Gold Rates Today : सोन्या चांदीच्या दरात पुन्हा घसरण, जाणून घ्या नवे दर
PM Narendra Modi : ‘बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेणं, ही माझ्या जीवनातील पहिली
‘आणखी किती फेकणार मोदीजी, हद झाली राव’, काँग्रेसकडून पंतप्रधानांवर खरमरीत टीका
PM मोदींच्या बांगलादेश दौऱ्याला विरोध, 4 आंदोलकांचा मृत्यू