नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय निवडणूक election आयोगाने देशातील पाच राज्यांच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. पश्चिम बंगालमध्ये मतदानाचा पहिला टप्पा 27 मार्चपासून सुरु होत आहे. त्यातच सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचे नेते आणि आमदारांचे ‘आउटगोईंग’ वाढले आहे. त्यानंतर आता निवडणुकीपूर्वीच election तृणमूल काँग्रेसच्या 5 आमदारांनी पक्षाला रामराम ठोकला.
Kolkata: TMC MLAs Sonali Guha, Dipendu Biswas, Rabindranath Bhattacharya, Jatu Lahiri and TMC candidate from Habibpur Sarala Murmu join BJP in presence of West Bengal party president Dilip Ghosh, BJP leaders Suvendu Adhikari & Mukul Roy #WestBengalElections2021 pic.twitter.com/4AtGAHa6H7
— ANI (@ANI) March 8, 2021
शीतल सरदार, जट्टू लाहिडी, सोनाली गुहा, दीपेंद्रू बिस्वास आणि रविंद्रनाथ भट्टाचार्य यांच्या समावेश आहे. तसेच तृणमूल काँग्रेसने उमेदवारी दिलेल्या उमेदवार सरला मुर्मू यांनी देखील पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम बंगाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष, मुकूल रॉय आणि शुभेंद्रू अधिकारी यांच्या उपस्थित प्रवेश केला.
दरम्यान, रविंद्रनाथ भट्टाचार्य हे 2001 पासून सिंगूर विधानसभा मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसचे आमदार राहिले आहेत. यंदाच्या निवडणुकीत त्यांना तृणमूल काँग्रेसकडून तिकीट दिले गेले नाही. त्यामुळे त्यांची पक्षावर नाराजी होती. याच नाराजीतून त्यांनी पक्षाला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला असल्याचे सांगण्यात येत आहे.
- ‘चोराच्या उलट्या बोंबा’; फडणवीसांच्या टीकेला जयंत पाटलांचे जोरदार प्रत्युत्तर
- Maharashtra Budget 2021 : विरोधकांच्या टीकेनंतर अजित पवार चांगलेच भडकले; म्हणाले – ‘भाजपची मक्तेदारी आहे का? आम्हाला काही कळतच नाही का?’
- Pune : महामेट्रोचा मोठा निर्णय ! आता पुणेकरांना मेट्रोतून सायकलसह प्रवास करता येणार
- माजी गृहमंत्री आर.आर. आबा यांच्या कुटुंबाने घेतली लस
- NCB मोठी कारवाई ! सुशांतसिंह राजपूत प्रकरणी नवी माहिती समोर; ड्रग्ज देणारा सापडला
- ठाकरे सरकारचे कोकणासाठी पुतना मावशीचे प्रेम ?
- मृण्मयी देशपांडेच्या ‘नो मेकअप’ लुकची सोशलवर जोरदार ‘चर्चा’ !