मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार sudhir mungantiwar यांनी राज्यातील सत्तांतरावर भाष्य केले होते. त्यामध्ये त्यांनी तीन महिन्यांत राज्यात सत्ताबदल होईल, असे संकेत दिले. त्यावर आता शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी चोख प्रत्युत्तर दिले. ‘सुधीर मुनगंटीवार sudhir mungantiwar उत्तम विनोद करतात. त्यांचे कार्यक्रम ठेवल्यास ते तूफान चालतील’, असे संजय राऊत म्हणाले.
सुधीर मुनगंटीवार sudhir mungantiwar यांनी राज्यात सत्तांतर होईल, यावर विधान केले होते. त्यावर आता संजय राऊत म्हणाले, लॉकडाउनमध्ये लागू असलेले निर्बंध शिथिल होत आहेत. त्यानुसार आता नाटकांचे प्रयोगही सुरू झाले आहेत. मला काही निर्मात्यांनी मदतीसाठी फोन केले. मात्र, मुनगंटीवार यांचे कार्यक्रम ठेवल्यास ते तुफान चालतील. ते उत्तम विनोद करतात. तसेच सरकारचे कामकाज योग्य दिशेने सुरू आहे. आमचे सरकार अतिशय मजबूत आहे. सरकार 5 वर्षांचा कालावधी पूर्ण करणारच, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, सरकारमधील घटक पक्ष असलेला काँग्रेस पक्ष नाराज आहे का? असे विचारले असता ते म्हणाले, काँग्रेस हा सर्वांत आनंदी पक्ष आहे. वाटत असेल तर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना विचारा.
सामनाच्या अग्रलेखावरून देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेला टोला, म्हणाले – ‘घाव वर्मी बसला’
लोकांच्या जीवनाचे प्रश्न महत्त्वाचे आहेत हे विरोधी पक्षाला कधी कळणार?