सांगली : सरकारसत्ता ऑनलाइन– Sangli Crime | सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ सामूहिक आत्महत्याप्रकरणी (Mhaisal Mass Suicide Case) पोलिस तपासात धक्कादायक माहिती समोर (Sangli Crime) आली आहे. येथील वनमोरे कुटुंबातील 9 जणांनी आत्महत्या केली असं वृत्त समोर आलं होतं. दरम्यान, हे आत्महत्याप्रकरण नसून विषारी औषध घालून मारल्याचा धक्कादायक खुलासा पोलिस तपासात समोर आला आहे. याबाबतची माहिती सांगलीचे पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम (SP Dixit Gedam) यांनी दिली. 20 जून रोजी म्हैसाळमध्ये वनमोरे कुटुंबातील 9 लोकांचं मृत्यू प्रकरण समोर आलं होतं. या घटनेमुळे सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली होती.
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्या माहितीनुसार, म्हैसाळ येथील वनमोरे कुटुंबातील 9 जणांनी आत्महत्या केली नसून त्यांना विषारी औषध घालून मारल्याचे पोलीस तपासात उलगडा झालाय. मागील सात ते आठ दिवस पोलिस याप्रकरणाचा कसून तपास करत होते. अखेर प्रकरणाच्या मुळाशी जाण्यात पोलिसांना यश आलंय. याप्रकरणी सध्या 19 आरोपी अटकेत आहे. पोलिसांनी आरोपींवर हत्येचं 302 कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. दोन आरोपींनी विषारी औषध दिलं. बाकी गोष्टी तपासात निष्पन्न होईल, अजूनही चौकशी सुरू आहे. (Sangli Crime)
दरम्यान, म्हैसाळ येथील पशुवैद्यकीय डॉक्टर असणारे माणिक वनमोरे आणि त्यांचे शिक्षक बंधू पोपट वनमोरे (Popat Vanmore), या दोघांनी आपली आई, पत्नी व मुलांच्या समवेत सामूहिक आत्महत्या केल्याचं म्हटलं जात होतं. दोन्ही कुटुंबांनी आपल्या घरात एकाच वेळी विष पिऊन आत्महत्या केली असावी, असं म्हटलं जात होतं. दरम्यान या घटनेनंतर अनेक सवाल उपस्थित होत होते. तसेच एकाच घरातील नऊजण कसे काय आत्महत्या करू शकतात याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते. वनमोरे बंधूंवर कोट्यवधी रुपयांचे कर्ज झाले होते. या कर्जाच्या वसुलीचा तगादा आणि सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचं वृत्त पसरलं होतं.
या आत्महत्याप्रकरणी पोलिस तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.
त्याचबरोबर वनमोरे कुटुंबातील 9 जणांनी आत्महत्या केली नसून त्यांना विषारी औषध घालून मारल्याचा धक्कादायक खुलासा झाला असल्याची माहिती आहे.
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
Privatization | विकली गेली ‘ही’ मोठी सरकारी कंपनी, आता रतन टाटा यांच्या हातात सूत्रे
Maharashtra Political Crisis | ‘… तर आमदार बरखास्तीची कारवाई सुरु होऊ शकते’ – प्रकाश आंबेडकर