अकोला : सरकारसत्ता ऑनलाईन – Aditya Thackeray On Eknath Shinde Govt | शिवसेनेचे Shivsena ( उद्धव बाळासाहेब ठाकरे Uddhav Balasaheb Thackeray) आमदार आदित्य ठाकरेंनी ‘गद्दारांचं सरकार कोसळणार’ म्हणत मध्यावधी निवडणुकीची (Mid-Term Elections) शक्यता वर्तवली आहे. ते अकोल्यातील बाळापूरमध्ये बोलत होते. (Aditya Thackeray On Eknath Shinde Govt)
राज्यात विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका कधीही घोषित होण्याची शक्यता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) नुकतीच व्यक्त केली होती. इतकचं नाही तर राज्य संपर्क प्रमुखांच्या बैठकीत बोलताना उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याच्या सूचना देखील दिल्या होत्या. त्यानंतर आता आदित्य ठाकरेंनीही मध्यावधी निवडणुकीची शक्यता वर्तवली आहे.
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
अकोल्यातील बाळापूरमध्ये ते म्हणाले की, “महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) असताना शेतकऱ्यांना २.५० लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी दिली. सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी करोना काळात ६.५० लाख कोटींची गुंतवणूक आणली. मात्र, हे घटनाबाह्य सरकार आहे. गद्दारांच सरकार कोसळणार म्हणजे कोसळणार, पुन्हा एकदा महाराष्ट्रात निवडणूका लागणार,” असा दावा आदित्य ठाकरेंनी केला.
तसेच सरकारवर टिकास्त्र सोडताना ते म्हणाले की, “राज्यात शेतकरी आत्महत्या, महिलांवरील अत्याचार वाढले
असून, उद्योग बाहेर गेले आहेत. महाराष्ट्रातील लोकांना खरे मुख्यमंत्री कोण आहे, याची माहिती नाही.
ते गद्दारीचा शिक्का डोक्यावर घेऊन फिरत आहे. उद्योगमंत्र्यांचे नाव कोणाला माहिती नाही.
आमचे सरकार असते तर ओला दुष्काळ जाहीर झाला असता,” असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
Web Title :- Aditya Thackeray On Eknath Shinde Govt | shinde fadnavis government collapse say aaditya thackeray in akola
Basavwadi Social Foundation | निगडी येथे सत्यशोधक व्याख्यानमाला संपन्न
KRK | रणबीर-आलियासाठी केआरकेने दिलेल्या शुभेच्छा पाहून भडकले नेटकरी
Prashant Damle | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशांत दामलें बाबत केली ‘ही’ मोठी घोषणा