मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – रत्नागिरीतील राजापूर तालुक्यातील बारसू परिसरात रिफायनरी (Barsu Refinery Project) होऊ घातलेल्या प्रकल्पाला स्थानिक नागरिकांनी विरोध केला आहे. प्रकल्पाविरोधात सुरु करण्यात आलेल्या आंदोलनाला (Barsu Refinery Project) शुक्रवारी वेगळे वळण लागले. सर्वेक्षण (Barsu Refinery Survey) सुरु असलेल्या ठिकाणी जाण्याच्या प्रयत्न करणाऱ्या आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप केला जात आहे. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी लाठीचार्ज झाला नसल्याचे सांगितले आहे. तर ठाकरे गटाने (Thackeray Group) या प्रकल्पाला जोरदार विरोध केला आहे.
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
बासरू प्रकल्पावरून (Barsu Refinery Project) आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही भूमिका स्पष्ट केली आहे. केंद्र सरकारने (Central Government) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री असताना ती जागा ठरवण्यात आली होती, पण स्थानिकांचा विरोध का आहे? मी काल उदय सामंत (Uday Samant) यांच्यासोबत बोललो. स्थानिकांचा विरोध का आहे? हे तपासलं पाहिजे. या प्रकल्पात नोकऱ्या मिळणार आहेत, काही राजकीय पक्षांच्या भूमिका वेगवेगळ्या आहेत, असं अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितलं.
अजित पवार पुढे म्हणाले, एनरॉनलाही (Enron Project) राजकीय विरोध झाला होता, पवार साहेब मुख्यमंत्री असताना विरोध झाला, पण नंतर युती सरकारने तो प्रकल्प केला. राजन साळवींचं (Rajan Salvi) वक्तव्य ऐकलं त्यांचा पाठिंबा आहे. त्या भागातल्या पर्यावरणाला कुठलाही फरक पडणार नसेल, तर गैरसमज दूर करुन प्रकल्प करण्यास काही हरकत नाही, अशी भूमिका अजित पावर यांनी मांडली.
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचं पत्र समोर आलं आहे. आता उद्धव ठाकरेंनी आपण जनतेच्या सोबत आहे, असं म्हटलंय. प्रकल्पाला जनतेचा विरोध असल्याने आपण विरोध करत असल्याची भूमिका उद्धव ठाकरे यांची आहे. ही त्यांची बाजू असल्याचे सांगत गरज पडली, माझं ठरलं तर मीही बारसूला जाईल असं अजित पवार यांनी सांगितलं.
Web Title :- Barsu Refinery Project | barsu project controversy ajit pawar reaction