Maharashtra Politics News | ‘तुमचं जेवढं आयुष्य, तेवढं शरद पवार यांचे राजकारण’, सामनाच्या अग्रलेखावरुन राष्ट्रवादीनं संजय राऊतांना सुनावलं

मुंबई :सरकारसत्ता ऑनलाईन – Maharashtra Politics News | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) हे राष्ट्रीय पातळीवर मोठे नेते नक्कीच आहेत. त्यांच्या शब्दाला राष्ट्रीय राजकारणात (Maharashtra Politics News) मान असला, तरी पक्ष पुढे नेईल असा वारसदार निर्माण करण्यात ते अपयशी ठरले, असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena Thackeray Group) मुखपत्र असलेल्या ‘सामाना’च्या अग्रलेखातून करण्यात आला आहे.
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
चारेक दिवसांपूर्वी निवृत्तीची घोषणा करताच पक्ष बुंध्यापासून हादरला व प्रत्येक जण आता आपले कसे होणार? या चिंतेने हादरुन गेला. कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी मनधरणी केली व लोकभावनेचा आदर राखून पवार यांनी राजीनामा (Maharashtra Politics News) मागे घेतला व यापुढे ते राष्ट्रवादीची धुरा सांभाळतील. त्यामुळे गेले चार-पाच दिवस सुरु असलेल्या नाट्यावर पडदा पडला अशा शब्दात समानाच्या अग्रलेखातून राष्ट्रवादीवर निशाणा साधण्यात आला आहे.
समाना अग्रलेखाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी संजय राऊतांना (Sanjay Raut) जाब विचारला आहे. महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) अजित पवार (Ajit Pawar), सुप्रिया सुळे (Supriya Sule), जयंत पाटील (Jayant Patil) यासह अनेक नेते आहेत. ते काम करण्यास समर्थ आहेत. या नेत्यांवर जी जबाबदारी टाकली जाईल, ती समर्थपणे पेलण्याची धमक या नेत्यांमध्ये असल्याचे छगन भुजबळ म्हणाले.
ते पुढे म्हणाले, तुमचं जेवढं आयुष्य आहे, तेवढं शरद पवार यांचे राजकारण आहे. राष्ट्रवादीमध्ये सुद्धा अजित पवार सुप्रिया सुळे, जयंत पाटील असे नेतृत्व करणारे नेते आहेत. ते कुणाच्या घरात गेले होते, त्यांना माहित. मात्र, संजय राऊत यांनी इतकं लक्ष शिंदे गटावर (Shinde Group) आणि त्यांच्या बॅगांवर ठेवले असते, तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती, असा टोला छगन भुजबळ यांनी लगावला.
शरद पवार यांनी ‘लोक माझे सांगाती’ (Lok Maze Sangati) या पुस्तकात जे काही म्हटलं आहे,
त्यावर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आधीच स्पष्टीकरण दिलं आहे.
मला महाविकास आघाडीत बिघाडी करायची नाही असं उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते.
मग संजय राऊतांनी हे सगळं उकरुन काढायची काय गरज आहे. त्यांना काय अडचण आहे.
त्यांना असं वाटतं का की राष्ट्रवादीनं महाविकास आघाडीतून बाहेर पडावं? असा संतप्त सवालही भुजबळ यांनी उपस्थित केला. यामुळे आगामी दिवसात राष्ट्रवादी विरुद्ध ठाकरे गट असा वाद रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
Web Title :- Maharashtra Politics News | ncp-leader-chhagan-bhujbal-has-criticized-thackeray-group-
leader-mp-sanjay-raut for saamana editorial
IAF MiG-21 Crash | घरावर कोसळलं मिग-21 लढाऊ विमान; दोघांचा मृत्यू, दोन महिला गंभीर जखमी
Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : खडक पोलिस स्टेशन – बनावट सोने विकणार्या महिलेला अटक
Comments are closed.