IMPIMP

Rebel Shivsena MLA Letter To Shivsainiks | बंडखोर आमदाराचं शिवसैनिकांना पत्र ! CM एकनाथ शिंदे अन् उध्दव ठाकरे यांच्यात जुळू नये यासाठी…?

by nagesh
Maharashtra Political News | all remaining 13 mlas of thackeray faction in touch with cm eknath shinde says uday samant

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनRebel Shivsena MLA Letter To Shivsainiks | एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात पक्षाविरूद्ध बंड करणार्‍या आमदारांनी आता आम्ही शिवसेनेशी कसे एकनिष्ठ आहोत हे दाखवण्यास सुरूवात केली आहे. चाळीस आमदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे शिवसेना आज मोठ्या संकटात आहे. पक्ष आणि पक्षचिन्ह वाचवण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) धावपळ करत आहेत. तर इकडे बंडखोर आमदारांनी शिवसैनिकांना पत्र लिहून आपण शिवसेना आणि ठाकरे यांचे हित पहात असल्याचे दर्शवले आहे. (Rebel Shivsena MLA Letter To Shivsainiks)

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

एकनाथ शिंदे आणि भाजपाशी (BJP) जुळवून घ्या असा सल्ला बंडखोर आमदार अजूनही देत आहेत. आता बंडखोर आमदार उदय सामंत (Uday Samant) यांनी शिवसैनिकांना पत्र लिहिले आहे. या पत्रावर बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि वाघाचा फोटो आहे, मात्र उद्धव-आदित्य (Aditya Thackeray) यांचा फोटो नाही. शिंदे-ठाकरे यांच्यात जुळू नये म्हणून कोण कट रचतंय ? याचा जाहीर खुलासा उदय सामंत यांनी पत्रातून केला आहे. (Rebel Shivsena MLA Letter To Shivsainiks)

 

उदय सामंत यांनी या पत्रात लिहिले आहे की, पत्र प्रपंच एवढ्यासाठीच, काल आपल्या रत्नागिरीमध्ये शिवसेनेचा मेळावा झाला. या मेळाव्यात रत्नागिरीचे कमी आणि लांजा, राजापूर व संगमेश्वरचे शिवसैनिक जास्त होते, असो. मेळाव्याची सुरुवात विभाग प्रमुखांच्या भाषणांनी झाली. त्यांनी शिवसेनेप्रति निष्ठा व्यक्त केली. त्यानंतर नेत्यांची भाषणे सुरू झाली अनेकांनी मला टोमणे मारले.

 

पण ती काही मंडळी कोण होती ? ज्यांनी खा. विनायक राऊत यांच्या पहिल्या आणि दुसर्‍या निवडणुकीला नारायण राणे यांच्या आदेशाचे पालन केले. काहींनी प्रचाराची पत्रकेदेखील गटारात फेकून दिली होती. त्यातील एकाने विनायक राऊत माझ्या अन्नावर जगतात नाहीतर त्यांना जेवण पण मिळू शकत नाही असे जाहीरपणे वर्तमान पत्रातून म्हटले होते.

 

माझा कोणावरच राग नाही पण दु:ख एकच आहे की, विनायक राऊत यांना आपले मानले, राजकारणापलीकडे जाऊन कौटुंबिक स्नेह जपले अशा व्यक्तीने मला गद्दार, उपरा अजून बरेच काही म्हणणे मला रुचले नाही. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सामील झालो तो एक शिवसैनिक म्हणूनच.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

ज्या व्यक्तीने बाळासाहेबांना जेलमध्ये पाठवण्याचा विचार केला. ज्यांनी बाळासाहेबांची टी बाळू म्हणून टिंगल केली. त्या व्यक्तीच्या विरोधात हा उठाव होता. हा उठाव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असतानाही शिवसेनेला राज्यात चौथ्या क्रमांकावर जावे लागते त्यासाठी होता.

 

विनायक दामोदर सावरकर यांना विरोध करणार्‍यांविरोधात हा उठाव होता.
जे लोक उद्धव ठाकरेंच्या स्वभावाचा फायदा घेत शिवसेना संपवू पाहणार्‍या वक्तींविरोधात हा उठाव होता.
माझ्या राजकीय कारकिर्दीचा विचार न करता याला गद्दारी म्हणायची की धाडस हे आपणच ठरवा.

 

आजवरच्या आयुष्यात मी कधीही विकासकामांबाबत राजकारण केले नाही.
म्हणूनच सर्व पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी माझे जिव्हाळ्याचे संबंध जोडले गेले हेही माझ्या कुटुंबानेच दिलेले संस्कार आहेत.
याच संस्कारातून मी कार्यकर्ते उभे करण्याचा प्रयत्न केला.
शासकीय योजनांसह वैयक्तिक पातळीवर मदत करून कार्यकर्ता कायमस्वरुपी उभा राहावा यासाठी मी प्रयत्न केले.
हेच माझ्या एवढ्या वर्षातील राजकारणाचे संचित आहे.

 

मी गुवाहाटीला जाईपर्यंत सर्वांना जोडण्याचा प्रयत्न करत होतो. ह्याचे साक्षीदार स्वत: खा. राऊत, अनिल देसाई हे आहेत.
ज्यांच्या मध्यस्थीने मी करत होतो त्यांचे नाव मी योग्यवेळी जाहीर करेन.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत उद्धव ठाकरे यांचे जुळू नये यासाठी काम करणारी काही माणसे तिथे होती.
हे खासदार विनायक राऊत यांनाही माहिती आहे. तसे त्यांनी मला बोलूनही दाखवले. मी त्यांना दोष देत नाही.
ते त्यांच्या ठिकाणी योग्यच आहेत.

 

मन एकाच विचाराने सुन्न होतं की, कालपर्यंत माझ्या वडिलांना देवमाणूस म्हणणारे,
माझ्या आईला लक्ष्मीचा अवतार म्हणणारे, माझ्या मोठ्या भावाला सज्जन म्हणणारे विनायक राऊत उपरा,
गद्दार आणि वैयक्तिक बरेच काही बोलले याचे मला दु:ख आहे. पण ते बोलले म्हणून मी बोलणार नाही.
त्यांनी मला राजकीय मदत नक्की केली आहे. ती मदत मी राजकीय कितीही मोठा झालो अथवा राजकारणात नसलो तरी विसरणार नाही.
कुणाच्या मनात संभ्रम राहू नये म्हणून पत्रातून संवाद साधत आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

घटक पक्षासोबतची अनैसर्गिक आघाडीसोबत राहण्यापेक्षा बाळासाहेब ठाकरे आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या विचाराने निर्माण झालेल्या युतीसोबत राहण्याचा मी निर्णय घेतला तर आता सांगा माझं काय चुकलं ? असा प्रश्न सामंत यांनी शिवसैनिकांना या पत्रातून विचारला आहे.

 

Web Title :- Rebel Shivsena MLA Letter To Shivsainiks | rebel mlas uday samant letter to shiv sainiks over eknath shinde and uddhav thackeray clashes

 

हे देखील वाचा :

Maharashtra Political Crisis | भाजपसोबत युती करण्यासाठी खासदारांचाही दबाव ? उद्धव ठाकरे यांच्या बैठकीनंतर ‘या’ खासदाराचा गौप्यस्फोट

Maharashtra Political Crisis | आदित्य ठाकरे बहुदा सत्ता गेल्यावर शिशुसेना काढण्याच्या तयारीत – भाजप आमदार

Pune Crime | सुनेच्या आत्महत्या प्रकरणी आळंदीच्या माजी नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांच्यासह पती आणि मुलाला अटक

 

Related Posts