औरंगाबाद : सरकारसत्ता ऑनलाइन – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे Shivsena – Uddhav Balasaheb Thackeray) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा आढाव घेण्यासाठी महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे. त्यावर आता शिंदे आणि फडणवीस सरकारच्या (Shinde – Fadnavis Government) समर्थकांनी भाष्य केले आहे. आता निवांत वेळ आहे. सगळे आमदार मातोश्रीवरुन निघून गेले आहेत. कार्यकर्त्यांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) घरात करमत नाही आणि म्हणूनच ते शेतकऱ्यांच्या बांधावर गेले आहेत, असे भाजपचे (BJP) माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे (Laxman Dhobale) यांनी म्हंटले आहे.
अडीच वर्षे सत्ता असताना एकही चांगले काम करावेसे ठाकरेंना (Uddhav Thackeray) वाटले नाही. आज शिंदे-फडणवीस सरकार जनतेच्या हिताचे निर्णय घेत आहे. विरोधकांना ते बघवत नाही. मातोश्रीचा (Matoshree) उंबरठा न ओलांडता देशात एक नंबरचा मुख्यमंत्री म्हणून हलगी वाजविण्याचे काम उद्धव ठाकरेंनी मोठ्या शिताफीने केले. कोकणातील अनेक घरे वाहून गेली. पूरामध्ये शेतकऱ्यांचे पीक वाहून गेले. तेव्हा त्यांनी काडीचीही मदत केली नाही. शेतकऱ्यांना आधार दिला नाही. पण आता सगळे पक्ष सोडून गेल्यावर त्यांच्याकडे निवांत वेळ आहे. म्हणून त्यांना आता घरात करमत नसल्याने ते शेतकऱ्यांच्या बांधावर फिरत आहेत, असे ढोबळे म्हणाले.
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
उद्धव ठाकरे यांनी काल औरंगाबाद (Aurangabad) दौऱ्यावर गेले होते. यावेळी ठाकरे बांधा बांधावर जाऊन शेतकऱ्यांची भेट घेतली. पिकांची पाहणी, शेतकऱ्यांच्या अडचणी यावर ठाकरे संवाद साधला.
ठाकरे या पाहणीतून सरकारवर ताशेरे ओढले.
या निर्दयी सरकारकडे केवळ भावनांचा दुष्काळ आणि घोषणांची अतिवृष्टी आहे.
आसूड फक्त हातात ठेवू नका, तो वापारा. सरकारला पाझर फुटत नसेल, तर घाम फोडा.
आमच्यासोबत गद्दारी केली, शेतकऱ्यांसोबत करु नका, असे ठाकरेंनी यावेळी म्हटले होते.
Web Title :- Uddhav Thackeray | ex minister laxman dhobale slams shivsena uddhav thackeray over aurangabad visit
Pune Crime | कात्रज परिसरातील मांगडेवाडीतून 10 लाखांचा चरस जप्त, तस्कराला अटक