मुंबई : महाराष्ट्रात लसींच्या पुरवठ्यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था नीट चालू नये अशी दिल्लीतील काही लोकांची इच्छा दिसते असा आरोप केला होता. त्यानंतर आता भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये Keshav Upadhye यांनी यावर भाष्य केले.
Pandharpur : दोन दिवसांत सकारात्मक निर्णय घेणार, अजित पवारांचे व्यापाऱ्यांना आश्वासन
देशात रुग्णांची संख्या सर्वात जास्त महाराष्ट्रात असताना सर्वात जास्त लसी महाराष्ट्राला मिळायला हव्यात. मात्र तसे मुद्दाम होऊ दिले जात नाही आहे. महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था नीट चालू नये अशी दिल्लीतील काही लोकांची इच्छा दिसते.
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) April 8, 2021
जयंत पाटील यांनी केंद्र सरकारवर टीका करताना म्हटले, की ‘कोरोनाविषयी केंद्र सरकारचे पहिल्यापासून मर्यादित सहकार्य आहे. तरीही महाराष्ट्राचे आरोग्य खाते, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि इतर संपूर्ण प्रशासन पूर्ण ताकदीने या संकटाचा मुकाबला करत आहे’. त्यानंतर आता केशव उपाध्ये Keshav Upadhye यांनीही निशाणा साधला. ते म्हणाले, ‘किमान शरद पवार यांना तरी विचारायचे. केंद्र सरकार सहकार्य करत आहे असे ते आता फेसबुक लाईव्हवर म्हणाले आहेत. इथले कोरोना हाताळणीतील ढळढळीत अपयश लपवयाला केंद्रावर टीका करणे तुम्हाला भाग आहे. पण शरद पवार यांना खोटं पाडू नका’, असा टोलाही लगावला.
माझे मौन हे कुणी कमजोरी समजू नये’, दवेंद्र फडणवीस सरकारवर कडाडले
किमान @PawarSpeaks यांना तरी विचारायचे. ते आता फेसबुक लाईव्हवर म्हणाले केंद्र सहकार्य करीत आहे. इथल कोरोना हाताळणीतील ढळढळीत अपयश लपवयाला केंद्रावर टीका करण तुम्हाला भाग आहे पण पवार साहेबांना खोट पाडू नका https://t.co/ZOk90oHYku
— Keshav Upadhye (@keshavupadhye) April 8, 2021
दरम्यान, लसींच्या पुरवठ्यावरून केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनीही ठाकरे सरकारवर निशाणा साधला होता. त्यानंतर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आकडेवारीसह लसींच्या पुरवठ्याविषयी माहिती दिली. आता याच मुद्यावरून केशव उपाध्ये Keshav Upadhye यांनी ट्विट करत भाष्य केले.
Coronavirus : न्यूझीलंडने भारताबाबत घेतला मोठा निर्णय, 28 एप्रिलपर्यंत ‘नो एंट्री’
Chitra Wagh : ‘ही मंडळी भ्याडच म्हणावी लागतील’
सचिन वाझेंच्या पत्रावरून फडणवीस म्हणाले; ‘पत्र गंभीर…
Chandrakant patil : ‘केंद्रीय आरोग्य मंत्र्यानी ठोक ठोक ठोकलंय’
महाराष्ट्रापेक्षा गुजरातला लसीचा पुरवठा अधिक, राजेश टोपेंचा मोदी सरकारवर गंभीर आरोप
‘खंडणीचे आरोप निराधार, माझी नार्को टेस्ट करा’ ! परब यांचे आव्हान
शरद पवारांची केंद्र सरकारसोबत चर्चा, केंद्र सरकारने दिले ‘हे’ आश्वासन