मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन- फेब्रुवारी महिन्यापासून राज्यात कोरोना Corona बाधित रुग्णांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली. गेल्या काही दिवसांपासून राज्यात रुग्ण वाढण्याचा वेग वाढला आहे. दररोज 25 हजारापेक्षा अधिक रुग्ण आढळून येत आहेत. रुग्णांची संख्या वाढत असताना मृत्यूची संख्या वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. चालू वर्षात पहिल्यांदाच बुधवारी सर्वाधिक रुग्ण आढळून आले. बुधवारी राज्यात 31 हजार 855 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत 5 हजारापेक्षा अधिक रुग्ण आढळून आले.
‘फोन टॅपिंग’ प्रकरणी अजित पवार संतापले ! रश्मी शुक्लांची चौकशी अटळ ?
राज्यात कोरोना Corona संसर्ग वेगाने वाढत असल्याने प्रशासनाने उपाय योजना देखील वाढवल्या आहेत. बंद करण्यात आलेले जम्बो सेंटर पुन्हा सुरु करण्यात आले आहेत. तर बेड्सची संख्या देखील वाढवण्यात आली आहे. वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यातील जनतेला मास्क वापरणे, सॅनिटायझर वापरणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे या त्रिसुत्रीचा अवलंब करण्याचे आवाहन केले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन दोन व्हिडीओ शेअर कले आहेत.
Nana Patole : ‘…तर सरकारनं देवेंद्र फडणवीस यांचीही चौकशी करावी’
‘मी जबाबदार… माझा मास्क, माझी जबाबदारी’ या शिर्षकाखाली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन व्हिडीओ शेअर केले आहेत. मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचे Corona रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशानाकडू करण्यात येत आहे. याशिवाय प्रत्येकाने मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे असेही आवाहन करण्यात येत आहे. राज्य सरकारकडून यासंदर्भात एक कॅम्पेन सुरु केल्याचे दिसत आहे. याद्वारे कायम हात स्वच्छ करत राहणे, सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क घालणे आवश्यक असल्याचा संदेश देण्यात येत आहे.
मी जबाबदार. माझा मास्क, माझी सुरक्षा
I am responsible. My mask, my safety pic.twitter.com/yrewGnybiM
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 25, 2021
मी जबाबदार. माझा मास्क, माझी सुरक्षा
I am responsible. My mask, my safety pic.twitter.com/pFc7iUiihd
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 25, 2021
BJP : महा’वसुली’ सरकारला फक्त सत्तेचीच चिंता
मुख्यमंत्र्यांनंतर आता उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात कोरोनाचा शिरकाव, 9 जणांना बाधा
Ramdas Athawale : ‘ठाकरे सरकार कलंकित, त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही’
संजय राऊत शिवसेनेत आहेत की राष्ट्रवादीत ? काँग्रेसचा संतप्त सवाल
‘केरळचे लोक सुशिक्षित असल्याने भाजपला मतं मिळत नाही’, भाजप नेत्याचे वक्तव्य