IMPIMP

NIA नं तपास पूर्ण झाल्यानंतर बोलावं, विनाकारण बातम्या पसरवू नयेत – जयंत पाटील

by bali123
ncp leader jayant patil ambani bomb threat nia sachin vaze investigation

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली स्फोटके आणि सचिन वाझे यांच्या चौकशीबाबत राष्ट्रीय तपास यंत्रणेने संपूर्ण निष्कर्षापर्यंत पोहोचल्यावर बोलावे उगाच रोज वेगवेगळ्या बातम्या पसरवू नयेत, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील jayant patil यांनी व्यक्त केले आहे. या सगळ्यामुळे तपास प्रक्रियेविषयी काहीच माहिती नसलेल्या समाजातील लोकांपर्यंत चुकीचा संदेश पोहोचतो. त्यामुळे NIA ने प्रथम संपूर्ण तपास पूर्ण करून या प्रकरणाचा पूर्णपणे छडा लावावा त्यानंतर अधिकृतपणे सर्वांसमोर येऊन बोलावे, असे मत जयंत पाटील jayant patil यांनी व्यक्त केले आहे. तसेच केंद्रीय यंत्रणांनी तपास जरुर करावा. मात्र, वर्तमानपत्रांमध्ये अमक्याने हे केलं, ते केलं, अशा बातम्या सोडू नयेत. जेव्हा NIA पुराव्यानिशी निष्कर्ष जाहीर करेल तेव्हा राज्य सरकार संबंधित दोषी व्यक्तींवर कारवाई करायला तयार आहे, असे जयंत पाटील म्हणाले.

सत्तेबाहेर असल्यामुळे नारायण राणेंची तडफड सुरु आहे : जयंत पाटील
काही दिवसांपूर्वी भाजपचे खासदार नारायण राणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती. यावर सुद्धा जयंत पाटील jayant patil यांनी भाष्य केले. पाण्याच्या बाहेर असल्यावर माशाची जशी तडफड होते तशीच अवस्था नारायण राणे यांची झाली आहे. नारायण राणे यांना पुन्हा कधी सत्तेत येऊन बसतो असे झाले आहे. यामुळे काही झाले तरी ते राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करत आहेत. जर हाच न्याय लावायचा झाल्यास प्रथम उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी लागेल, असे जयंत पाटीलांनी म्हटले आहे.

‘फडणवीसांनी विरोधी पक्षात बसण्याची सवय अंगवळणी पाडून घ्यावी’
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यापासून भाजपचे नेते सातत्याने सरकार पडणार, असे म्हणत आहेत. तसेच आताच्या अधिवेशनात भाजप पहिल्यांदाच विरोधी पक्षाप्रमाणे वागताना दिसला आहे. देवेंद्र फडणवीस यांना खात्री झाली आहे की, आपल्याला पुढील साडेतीन वर्षे विरोधी पक्षातच बसायचे आहे. त्यानुसार त्यांनी अधिवेशनात विरोधी पक्षनेत्याची भूमिका चोख पार पाडली आहे. तसेच विरोधी पक्षात बसण्याची सवय फडणवीसांनी अंगवळणी पाडून घेतली पाहिजे असा टोला देखील जयंत पाटील यांनी लगावला आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये समन्वय आहे. तसेच शिवसेनेकडून सचिन वाझे यांना पाठिशी घालण्याचा प्रश्नच येत नाही. या प्रकरणात जे कोणी दोषी आहेत त्याला शिक्षा होणारच, असे जयंत पाटील म्हणाले आहेत.

‘कोरोनाचं महाराष्ट्रावर की सरकारचे कोरोनावर प्रेम?’, मनसेचा खोचक सवाल

Mumbai : पोलीस आयुक्त पदासाठी ‘ही’ नावे चर्चेत, CP परमबीर सिंग यांना सचिन वाझे प्रकरण भोवणार?

पुण्याच्या उपमहापौर सरस्वती शेंडगे यांचा राजीनामा

ED ची मोठी कारवाई ! सुशिलकुमार शिंदेची मुलगी, जावयाची कोट्यावधीची मालमत्ता जप्त

 

Zomato डिलिव्हरी बॉयच्या तक्रारीनंतर ‘त्या’ तरुणीविरोधातच FIR

Related Posts