मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित Corona रुग्णांची संख्या वाढत आहे. ही रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. पण या कोरोना व्हायरसचे थैमान अद्याप सुरुच आहे. त्यानंतर आता कोरोनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरात शिरकाव केल्याचे समोर आले.
IND vs ENG : ‘या’ 5 कारणांमुळे टीम इंडियाने कालचा सामना जिंकला
राज्याचे पर्यावरणमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्री ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनाही कोरोना Corona व्हायरसची लागण झाली आहे. तसेच मुख्यमंत्री ठाकरेंच्या संपर्कात आलेले अनेकजण कोरोनाबाधित आढळत आहेत. यातील अनेकांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच पाणी फाऊंडेशनच्या ‘सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धेचा (पहिला टप्पा) ‘गौरव सोहळा’ पार पडला होता. त्यावेळी मुख्यमंत्र्यांसह अभिनेता आमिर खान, राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे आणि इतर नेतेमंडळी उपस्थित होती. या कार्यक्रमानंतर दुसऱ्याच दिवशी आमिर खान कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली.
केंद्राच्या नावाने बोटे मोडणार्यांनी ‘हे’ आवर्जून वाचलं पाहिजे’
दरम्यान, राज्यात कोरोनाच्या Corona संकटामुळे प्रशासनावर मोठा ताण पडत आहे. तर दुसरीकडे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आटोक्यात येत नाही. त्यामुळे बीडसह अनेक जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. तसेच सध्या अनेक नेतेमंडळींना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे.
‘पुन्हा येण्यात अनेकदा अपयश येऊनही प्रयत्न न सोडण्याची त्यांची जिद्द बघता कौतुक करावंसं वाटतं !’
महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवटीविषयी राष्ट्रवादीच्या नेत्याचे मोठं वक्तव्य; म्हणाले…
प्रसिद्ध कृष्णा म्हणाला – ‘मला भागीदारी तोडणारा गोलंदाज व्हायचे आहे’
फोन टॅपिंग करण्याचा अधिकार फडणवीसांना दिला कोणी; जयंत पाटलांचा सवाल
‘देवेंद्र फडणवीस हे अहंकारी आणि लबाड, माझ्याकडे त्यांच्या प्रकरणांचा गठ्ठा !’
आर्किटेक्ट एकनाथ निमगडे हत्या प्रकरण : देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानाजवळ आंदोलन, पुतळा जाळला
Gold Price Today : सोन्याच्या दरात पुन्हा मोठी घसरण; जाणून घ्या पुणे-मुंबईतील आजचा भाव
‘भाई जगताप असा टपोरी ज्याला ‘भाई’ बनायचं होतं पण… ; निलेश राणेंची टीका