IMPIMP

Ajit Pawar | मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावर अजित पवारांची तीव्र नाराजी; म्हणाले…

by nagesh
Ajit Pawar | ajit pawar expressed his displeasure over the stalled work of mumbai goa highway

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – आज दि.९ राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांच्या मतदार संघात गेले असता राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या कामावर तीव्र नाराजी व्यक्त केली. ते खासदार सुनिल तटकरे यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याप्रसंगी बोलत होते. (Ajit Pawar)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

यावेळी बोलताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले की, ‘कोकणाचा व महाराष्ट्राचा गौरव वाढवण्याचं काम सुनील तटकरेंनी करत रहावं. ज्याप्रकारे आज अवघा महाराष्ट्र मधू दंडवते यांना कोकण रेल्वे सुरू करण्याचं श्रेय देतो, त्यामध्ये अर्थातच शरद पवार यांचा खूप महत्त्वाचा पाठिंबा होता. आता मुंबई-गोवा महामार्गाचं काम गेल्या दशकापासून रखडलेलं आहे. हे काम सुनील तटकरे यांच्या माध्यामातून मार्गी लागावं, असे ते सुनिल तटकरे यांना उद्देशून म्हणाले. तर लोकसभा खासदार म्हणून त्यात त्यांचं महत्त्वाचं योगदान असावं. त्यांच्या माध्यमातून कोकणच्या विकासाला अधिक चालना मिळावी, अशी अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि ती तुम्ही पूर्ण करावी या बद्दलही मी खात्री बाळगतो. त्या मार्गाने जाणारे कोकणवासीय अक्षरशा वैतागले आहेत. कितीतरी टर्म झाल्या परंतु तो रस्ता काही होत नाही. त्या वेदना त्या रस्त्याने जाणाऱ्यांनाच होतात, हे पण आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला हवं.’ असेही ते म्हणाले.

 

सुनिल तटकरे यांनी केलेल्या कार्याचा दाखला देत पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, ‘सुनील तटकरे यांनी त्यांच्या ३० वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत पंचायत समिती, जिल्हापरिषद, विधानसभा, विधानपरिषद आणि आता लोकसभा अशा विविध पातळ्यांवर काम केलं आहे. रायगड जिल्हापरिषदेचे सर्वात तरुण अध्यक्ष म्हणून त्यांची नोंद देखील झालेली आहे. राज्यमंत्रिमंडळातही त्यांनी अतिशय महत्त्वाची खाती सांभाळली आहेत. दोनवेळा ते पक्षाचे प्रदेशाध्यक्षही होते. राष्ट्रीय कार्यकारिणीत त्यांना आथा महासचिव पद मिळालेलं आहे आणि त्यांची राजकीय कारकिर्द ही सतत चढती राहिलेली आहे. त्यांच्या कारकिर्दीचा आलेख असाच चढता रहावा आणि महाराष्ट्राला व राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांचं नेतृत्व लाभावं. त्यांच्या कर्तृत्व, वक्तृत्वातून फायदा होत राहो, अशाप्रकारच्या शुभेच्छा आजच्या पुस्तक प्रकाशनानिमित्त मी देतो.’ असे अजित पवार म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

मुंबई-गोवा महामार्गावर भाष्य करताना ते म्हणाले की, ‘गेली १३ वर्षे मुंबई – गोवा महामार्गाचे काम रखडले असून
हा महामार्ग होळीपूर्वी पूर्ण करण्याच्या मागणीसाठी मुंबई – गोवा महामार्ग ध्येयपूर्ती समितीच्या नेतृत्वाखाली
मुंबई महानगर, रायगड, रत्नागिरीसह अन्य भागांतील कोकणवासियांनी आंदोलन सुरू केले आहे.
या आंदोलनाचा भाग म्हणून मुंबईत १ जानेवारीपासून स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आली आहे.
आतापर्यंत एक हजार ७८५ जणांनी स्वाक्षरी केली असून ही मोहीम ठिकठिकाणी महिनाभर राबविण्यात येणार आहे.’

 

तसेच मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण व्हावे यासाठी सामाजिक, राजकीय संघटनांनी वेळोवेळी आंदोलने देखील
केली आहेत. मात्र सरकार या प्रश्नाकडे गांभिर्याने लक्ष देत नसल्यामुळे या महामार्गाचे काम रखडले आहे.
दरवर्षी पावसाळ्यात या महामार्गाची अत्यंत बिकट अवस्था होते.
त्याचप्रमाणे गणेशोत्सव काळात हा खड्डेमय रस्ता पार करताना कोकणवासियांची दमछाक होते.

 

Web Title :- Ajit Pawar | ajit pawar expressed his displeasure over the stalled work of mumbai goa highway

 

हे देखील वाचा :

Pune Pimpri Crime | OLX वर कार घेणं पडलं महागात, युवकाची साडेचार लाखाची फसवणूक; सांगवी परिसरातील घटना

Farhan Akhtar | बॉक्सरसारखी बॉडी बनवण्यासाठी फरहानने केली खुप मेहनत, जाणून घ्या त्याच्या फिटनेसचे 7 सीक्रेट

Pune Pimpri Crime | पेटीएम बँकेचे केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने फसवणूक, दिघी परिसरातील घटना

 

Related Posts