पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा (Maharashtra Political Crisis) निकाल सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) दिला
आहे. या निकालावर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी थोडक्यात प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल आला आहे. मी
माहिती घेतो, मला निकाल पत्र वाचण्यास वेळ मिळाला नाही. त्यामुळे मी यावर काही बोलणार नाही. मी उद्या बोलतो. फक्त मी दिल्लीला गेलो नाही
एवढेच सांगा, अशी मिश्किल टिप्पणी अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली आहे.
बुधवारी कोर्टाच्या निकालापूर्वी बोलताना अजित पवार यांनी लातूरमध्ये म्हटले होते की, जरी 16 आमदार अपात्र (MLA Disqualified) झाले तरी सरकारकडे बहुमत असेपर्यंत सरकारला कोणताही धोका नाही. त्याचाच पुनरुच्चार आज पुण्यात बोलताना अजित पवार यांनी केला. मी बोललो त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आलेला आहे. मला जे वाटले ते बोललो आणि तसा निकाल सुद्धा आलेला आहे. पणी आणखी निकालाची प्रत वाचलेली नाही. त्यामुळे मी यावर बोलणार नाही, असे अजित पवार यांनी सांगितले.
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
मी निकालपत्र वाचून सविस्तर भूमिका मांडेन. मला जे काही या अनुषंगाने बोलायचंय ते बोलेन.
कृपा करुन फक्त मी दिल्लीला वगैरे चाललोय असं सांगू नका, असं म्हणत अजित पवारांनी पत्रकारांची फिरकी घेतली.
अजित पवार पुणे विमानतळावर (Pune Airport) पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी आपल्या शैलीत पत्रकारांना उत्तर दिलं.
Web Title :- Ajit Pawar | ajit-pawar-reaction-to-the-court-verdict-of-shiv-sena-and-shinde-group