IMPIMP

Bombay High Court | …तोपर्यंत सरकारी दस्तावेजांवरील औरंगाबाद नाव बदलू नका, मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

by nagesh
Bombay High Court | chhatrapati sambhaji nagar do not change aurangabad name on government documents till final decision court order

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – राज्य सरकारने औरंगाबाद (Aurangabad) शहराचं नामांतर छत्रपती संभाजीनगर (Renamed Chhatrapati Sambhajinagar) आणि उस्मानाबादचं (Osmanabad) नामांतर धाराशिव (Dharashiva) करण्याचा निर्णय घेतला. राज्य सरकारच्या (State Government) या निर्णयाला केंद्र सरकारचा (Central Government) हिरवा कंदील मिळाल्यानंतर दोन्ही शहरांचे नामांतर करण्यात आले. मात्र, या नामांतराच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने महत्वाचे आदेश दिले आहेत. अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत औरंगाबादचं नाव सरकारी दस्तावेजांवर बदलू नका अशा सूचना मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) दिल्या आहेत. त्यामुळे याचिकाकर्त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन शहरांची नावे बदलण्याच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली. यावेळी मुस्लिम बहुल विभागात नावं तातडीनं बदलण्याची जणू मोहीमच हाती घेतल्याचा याचिकाकर्त्याने कोर्टात आरोप केला. यावर सुनावणी करताना नामांतराबाबत अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत औरंगाबादचं नाव सरकारी दस्तावेजांवर (Government Documents) बदलू नका असे आदेश न्यायालयाने दिले. तर औरंगाबाद नामांतराच्या मुद्यावरील याचिकेवर पुढील सुनावणी 7 जूनपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.

 

 

याचिकाकर्त्याने आपली भूमिका मांडताना, शहरातील टपाल कार्यालय, महसूल, स्थानिक पोलीस, न्यायालय इथ संभाजीनगरचा खुलेआम उल्लेख आणि वापर सुरु झाल्याची हायकोर्टात तक्रार केली. मुस्लिम बहुल विभागात नाव तातडीनं बदलण्याची जणू मोहीमच हाती घेतल्याचा याचिकाकर्त्याने कोर्टात आरोप केला. यावर सुनावणी करताना नामांदराबाबत अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत औरंगाबादचं नाव सरकारी दस्तावेजांवर बदलू नका, असे होत असेल तर ते तातडीने थांबवा, असे न्यायालयाने म्हटले.

 

उस्मानाबाद जिल्हाधिकाऱ्यांनी काढला आदेश
उस्मानाबादचं धाराशिव करण्याबाबतही निर्णय घेण्यात आला आहे. उस्मानाबादच्या नामांतराविरोधात मुंबई उच्च न्यायालयात रीट याचिका दाखल करण्यात आली आहे. सध्या या याचिकेवर सुनावणी सुरु आहे. त्यामुळे न्यायालयाचे पुढील आदेश येईपर्यंत सरकारी कार्यालयांनी उस्मानाबाद नावात बदल करु नयेत, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहेत. याबाबत एक पत्रक जिल्हाधिकारी कार्यालयाकडून काढण्यात आलं आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Bombay High Court | chhatrapati sambhaji nagar do not change aurangabad name on government documents till final decision court order

 

हे देखील वाचा :

Maharashtra IPS Transfer | आयपीएस अनिल पारसकर, अभिनव देशमुख, सारंग आव्हाड, शशिकुमार मीना, प्रविण पाटील, अरविंद चावरिया यांच्यासह 10 जणांना पोलिस उप महानिरीक्षक पदी बढती

Maharashtra IPS Transfer | अप्पर पोलिस आयुक्त राजेंद्र डहाळे, जालिंदर सुपेकर यांची पदोन्नतीवर बदली ! पुण्यात अप्पर आयुक्त म्हणून प्रविण पाटील व अरविंद चावरिया यांची नियुक्ती

Ajit Pawar | लोकसंख्येच्या बाबतीत भारत जगात पहिला, कठोर निर्णय घेण्याची वेळ आली; अजित पवारांनी केंद्राकडे केली ‘ही’ मागणी

 

Related Posts