IMPIMP

CM Uddhav Thackeray On Devendra Fadnavis | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फडणवीस यांना टोला; म्हणाले – ’शेराला सव्वाशेर असतोच’

by nagesh
CM Uddhav Thackery On Devendra Fadnavis CM uddhav thackeray lashes out at devendra fadnavis over defeat in rajya sabha elections

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – CM Uddhav Thackeray On Devendra Fadnavis | शिवसेनेच्या 56 व्या वर्धापन दिनानिमित्त (Shivsena 56th Anniversary) पवई येथील वेस्टिन हॉटेलच्या सभागृहात एका सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेना (Shivsena) पक्ष प्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी बोलताना त्यांनी राज्यसभेच्या पराभवावरून नाव न घेता देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर निशाणा साधला. शेराला सव्वा शेर असतोच, आजचे राजकारण पावशेराचे आहे, अशी टिका ठाकरे यांनी केली. (CM Uddhav Thackeray On Devendra Fadnavis)

 

उद्धव ठाकरे म्हणाले की, ज्यांना सत्तेचा माज करायचा असेल त्यांनी भाजपमध्ये जावे आणि सत्तेचा माज करावा. किती दिवस चालेल. प्रत्येकाला पर्याय असतोच. जसे शेराला सव्वाशेर असतो. उद्या जर तुम्ही शेर असाल तर सव्वाशेर येईलच. आजचे राजकारण हे पाव शेराचे आहे.

 

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, उद्याच्या निवडणुकीत आमच्यात फुट पडू शकत नाही, याची मला चिंता नाही. उद्या जर तुम्ही वेगळे काही केले तर महाराष्ट्र वेगळा विचार करू शकतो, हे उद्या देशाला दाखवायचे आहे. सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, पण महाराष्ट्रातील जनता ही तुमचा शहाणपणा चालवू देणार नाही, सत्तेचा माज चालणार नाही. (CM Uddhav Thackeray On Devendra Fadnavis)

 

शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना ठाकरे म्हणाले, राज्यसभेत दुर्दैवाने पराभव झाला, आपला संजय पवार हा खासदार झाला असता. आता कोण आहे सचिन अहिर आहे, पाडवींचा मागे निसटता पराभव झाला. नंदुरबारचा आवाज विधान परिषदेत का जाऊ नये. म्हणून त्यांना मतदान झाले पाहिजे. महाराष्ट्र पेटत नाही, आणि जेव्हा पेटतो तेव्हा समोरच्याला जाळून टाकतो.

 

हिंदुस्थानावरचा हिरवा वरवंटा महाराजांनी काढला. सचिन अहिर चांगले काम करतोय. आमशा पाडवी 1300 मतांनी पडले. आदिवासींचा हक्काचा माणूस. संपर्क प्रमुख म्हणून अहिरांचे काम चांगले. हे आपलेच आहेत. शिवसेनेच्या बांधणीसाठी नविन रक्त आहे, असे ते म्हणाले.

 

मोदी सरकारवर टीका

उद्धव ठाकरे यांनी अग्निपथ योजनेवरून मोदी सरकारवर सुद्धा यावेळी टिका केली.
ते म्हणाले, अग्निपथ योजनेमुळे तरुण रस्त्यावर उतरले आहे. हृदयात राम आणि हाताला काम हे चित्र आज देशात दिसत नाही.
काम नसेल तर रामराम म्हणून काही उपयोग नाही. 2 कोटी नोकर्‍या देणार म्हटले आणि काहीही दिले नाही.
अचानक योजना आणायची अग्निवीर नाव द्यायच पण शिकवणार काय? तर सुतार काम शिकवणार आहेत.
मग चार वर्षांनी यांच्या नोकरीचे काय? असा सवाल त्यांनी केला.

 

आता उमेदीच्या वयात तरूणांना काहीतरी दाखवणार नंतर फक्त 10% लोकांना घेणार.
भाडोत्री सैन्य, मग टेंडर काढणार. तुम्ही मग सगळेच वापरा आणि फेका.
मग ही लोक भडकणार नाही तर काय होणार. तुम्हाला नुसते मत दिले नाही,
तर आयुष्य दिले आहे, अशी टिका उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर केली.

 

Web Title :- CM Uddhav Thackeray On Devendra Fadnavis | CM Uddhav Thackeray lashes out at devendra fadnavis over defeat in rajya sabha elections

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

हे देखील वाचा :


 

 

Related Posts