अकोला : सरकारसत्ता ऑनलाईन – आमदार बच्चू कडू (MLA Bachchu Kadu) आणि रवी राणा (MLA Ravi Rana) यांच्यामध्ये सत्तेतील हिश्श्यावरुन वाद आहेत, अशी टीका काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे. राज्यात अनेक महत्त्वाचे प्रश्न आहे. आम्हाला जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायचे आहे. त्यांच्या वादाशी काही देणे-घेणे नाही, असेही नाना पटोले (Nana Patole) यांनी स्पष्ट केलं. ते भारत जोडो यात्रेच्या (Bharat Jodo Yatra) निमित्ताने अकोला जिल्ह्यातील वाडेगाव येथे आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
सत्तेत सहभागी बच्चू कडू व रवी राणा यांच्यावर निशाणा साधताना नाना पटोले (Nana Patole) म्हणाले, सत्तेमध्ये बसलेले आमदार 50 खोक्यांसाठी भांडत असतील, आरोप-प्रत्यारोप करत असतील, पण त्यांच्यापेक्षा आम्हाला जनतेचे प्रश्न महत्वाचे आहेत. या दोघांच्या भांडणावर लक्ष देण्याची गरज नसल्याचे पटोले यांनी सांगितले.
अकोला शहरात सलग दोन खूनाच्या (Murder) घटना घडल्या आहेत.
जिल्ह्याचे पालकमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आहेत.
ते सुपरमॅन आहेत, सहा-सहा जिल्ह्यांचे पालकमंत्री पद घेतले. मात्र, आता काम जमत नाही.
राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्था (Law and Order) बिघडलेली आहे, कुठेही सरकारचे लक्ष नाही.
फक्त सत्ताधारी राज्याच्या तिजोरीतील जनतेचे पैसे लुटत आहेत.
भ्रष्टाचार आणि भय या दोन्ही गोष्टीच्या आधारावर राज्यात ईडीचे सरकार निर्माण झाले आहे.
ते फक्त लूटपाट करण्यासाठी असून जनतेच्या सुरक्षेसाठी नाही, असा आरोप नाना पटोले यांनी केला.
Web Title :- Nana Patole | controversy over bachchu kadu and ravi raana criticism various parties nana patole
Priyanka Chopra | भारतात येताच प्रियंकाने मोरबी दुर्घटनेवर शेअर केली पोस्ट, म्हणाली कि….