मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे शिर्डी येथे आज पासून दोन दिवसीय मंथन शिबिराला सुरुवात झाली आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) नेतृत्वाखालील सरकारच्या भवितव्याबाबत सूचक विधान केले आहे. यावरुन शिंदे गटाचे आमदार (Shinde Group MLA) शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांनी अजित पवारांना खोचक सवाल केला आहे. 1995 साली अजित पवारांनी सरकार पाडलं नाही. तेव्हा कुठे गेले होते ते? असा सवाल शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांनी केला आहे.
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
काय म्हणाले जयंत पाटील?
जयंत पाटील यांनी राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सत्तेत असलेलं सरकार राष्ट्रवादीच्या अधिवेशनानंतर पडेल, असे सूचक भाकित केलं आहे. यावर अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, जोपर्यंत 145 आमदार एकनाथ शिंदेंच्या पाठिशी आहेत, तोपर्यंत हे सरकार चालेल. ज्यादिवशी हा आकडा कमी होईल, त्या दिवशी हे सरकार जाईल असे अजित पवार यांनी म्हटले होते. त्यामुळे शिंदे सरकार कधीपर्यंत सत्तेत राहणार? याबाबत चर्चा सुरु झाली असताना शहाजीबापू पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
अशी भाकितं यापूर्वी…
शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) एका वृत्तवाहीनीशी बोलताना म्हणाले, अशी भाकितं यापूर्वी अनेकदा करण्यात आली आहेत. 1995 साली जेव्हा मी पहिल्यांदा काँग्रेसकडून (Congress) आमदार झालो, तेव्हा 5 वर्षे शरद पवार (Sharad Pawar) आम्हाला सांगायचे की पुढच्या महिन्यात सरकार पडणार आहे. पण मनोहर जोशी (Manohar Joshi) यांचे सरकार काही केल्या पडलं नाही. आम्हाला निवडणुकीला सामोरं जावं लागलं. आताही सरकार पडणार असं म्हणत त्यांच्या पक्षाचे जे लोक शिंदे गट आणि भाजपकडे (BJP) निघून चालले आहेत, त्यांना अडवण्यासाठी अशी भीती दाखवणारी विधानं करत आहेत, असे पाटील म्हणाले.
तुम्ही एवढे बुद्धिमान आहात का?
अजित पवारांच्या विधानावर शहाजीबापू यांनी खोचक टोला लगावला. अजित पवार किंवा शरद पवार ही मोठी राजकारणी माणसं आहेत. 95 सालीही अजित पवारांनी सरकार पाडलं नाही. तेव्हा कुठे गेले होते ते? कुठल्या गावाला गेले होते अजित पवार? पाडायचं होतं की सरकार. त्यावेळी एवढंसं सरकार होतं. शिवसेना-भाजपच्या 100 जागाही नव्हत्या. ते तुम्हाला पाडता आलं नाही. आता खणखणीत 175 आमदारांचे बहुमत असलेले सरकार आहे. ते आता तुम्ही पाडायला लागले आहेत. तुम्ही एवढे बुद्धिमान आहात का? असा टोला शहाजीबापूंनी लगावला.
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
Web Title :- Shahajibapu Patil | shahaji bapu patil shinde group mocks ajit pawar jayant patil
CM Eknath Shinde | ‘…पण उद्धव ठाकरेंनी आमचं ऐकलं नाही’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला खुलासा