मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन– Thackeray Government | राज्यातील विद्यार्थी आणि पालकांसाठी एक महत्वाची माहिती समोर आली आहे (Good News For Students And Parents). राज्यातील सर्व शाळांमधील (Maharashtra School) पुस्तकांबाबत नवीन नियम लागू करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने (Thackeray Government) घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्याच्या पाठिवरचे ओझे कमी होणार आहे. यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना ठाकरे सरकारकडून एक मोठा दिलासा देण्यात आला आहे.
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
येत्या शैक्षणिक वर्षांपासून इयत्ता पहिलीसाठी (First Class) राज्यातील सर्व शाळामध्ये नियम लागू होणार आहेत.
त्याचबरोबर इयत्ता दुसरीसाठी (Second Class) 101 तालुक्यात एकात्मिक पुस्तके लागू होणार आहेत.
या नव्या शैक्षणिक वर्षासाठी राज्य सरकारकडून सर्व तयारी सुरु आहे. दरम्यान, या निर्णयामुळे आता विद्यार्थ्यांच्या पाठीवरचा पुस्तकांचा भार कमी होणार आहे. (Thackeray Government)
दरम्यान, शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरील न पेलवणारा पुस्तकांचा भार आता कमी करण्यात येणार आहे.
याबाबतचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून त्यादृष्टीने कृतीशील पावले टाकण्यात येत आहेत.
दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी केंद्रीय समितीकडून (Central Committee) शिफारस करण्यात आली होती.
यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
Web Title :- Thackeray Government | important news for first and second class students and parents the load of books will be reduced on the backs of students in all schools in maharashtra