इंदापूर : सरकारसत्ता ऑनलाइन– इंदापूर तालुक्यातील जेष्ठ पत्रकार रमाकांत तोरणे (वय ७९) यांचे बावडा येथील निवासस्थानी अल्पशा आजाराने आज (दि. ३ फेब्रुवारी) रोजी सकाळी सहा वाजता निधन झाले (Ramakant Torne Passes Away). विविध वृत्तपत्रांमध्ये त्यांनी अनेक विषयांवर विपूल लिखाण केले होते. ते उत्तम व्यंगचित्रकारही होते. (Ramakant Torne Passes Away)
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
जोशी अभ्यंकर हत्याकांड निकालावेळी रमांकांत तोरणे यांनी एका वृत्तपत्रात “फाशीची शिक्षा असावी की नसावी?, फाशीची शिक्षा म्हणजे सूड नव्हे” या विषावर एक विशेष लेख लिहला होता. या लेखाचे तत्कालीन मुख्य न्यायाधिश चंद्रचूड यांनी कौतुक करून निकालावेळी या लेखाचा संदर्भ दिला होता. या लेखाचे संपुर्ण महाराष्ट्रात कौतुक झाले होते. यांनतर न्या. चंद्रचूड यांनी त्यांना पत्र पाठवून या लेखाचे कौतुक केले होते. रमाकांत तोरणे यांच्या मृत्यू पश्चात दोन विवाहित मुले, पाच विवाहित मुली सूना, नातवंडे असा परिवार आहे.
Web Title :- Veteran journalist Ramakant Torne passes away
Gold Silver Price Today | सोन्या-चांदीचे भाव ‘जैसे थे’; जाणून घ्या आजचा 10 ग्रॅमचा दर
Diabetes Control | डायबिटीजच्या रूग्णांसाठी परिणामकारक आहे कच्ची हळद, जाणून घ्या कशी