नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या पश्चिम बंगाल आणि आसामसह पाच राज्यातील विधानसभा निवडणुका सुरु आहेत. पश्चिम बंगाल आणि आसाम निवडणुकांचा दुसरा टप्पा पार पडला आहे. तर केरळ, पुदुच्चेरी, तामिळनाडू येथील प्रचार जोर धरु लागला आहे. काँग्रस आणि भाजप नेते जोरदार प्रचार करत असून मतदारांना आपल्या मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी rahul gandhi यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर टीका केली आहे. राहुल गांधी rahul gandhi यांनी केवळ दोनच शब्दात निवडणूक आयोगावर टीका केली आहे.
CM उद्धव ठाकरेंनी घेतला राज ठाकरेंचा समाचार, म्हणाले…
Election “Commission”.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) April 3, 2021
राहुल गांधी rahul gandhi यांनी ट्विटरच्या माध्यमातून निवडणूक आयोगावर टीका करताना म्हटले आहे Election ”Commission” असे दोनच शब्द राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहेत. राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर टीका करण्यापूर्वी काँग्रेसच्या सचिव प्रियंका गांधी यांनी टीका केली होती. पश्चिम बंगालमध्ये एका भाजप नेत्याच्या गाडीमध्ये ईव्हीएम मशिन आढळून आल्याने खळबळ उडाली होती. यावरुन प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधत टीकास्त्र सोडले आहे.
Kirit Somaiya : ‘…म्हणून उद्धव ठाकरेंनी माझ्याकडून 100 कोटी वसूल करायला सांगितलंय’ (Video)
दरम्यान, राहुल गांधी यांनी केंद्रातील भाजप सरकारवर कृषी विधेयकावरून निशाणा साधला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) हल्ल्याची शिकवण देते. तर अहिंसात्मक सत्याग्रह शेतकऱ्यांना निर्भय बनवितो, असे प्रतिपादन राहुल गांधी यांनी केले. आरएसएसचा एकजुटीने मुकाबला करुन तीन कृषी कायदे केंद्रातील मोदी सरकारला रद्द करायला भाग पाडू, असे राहुल गांधी rahul gandhi यांनी म्हटले आहे.
‘कोणाचीही गय करु नका, कोरोना निर्बंध आणखी कडक करा’ – सभापती रामराजे नाईक-निंबाळकर
‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’ म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्याच घरात ‘कोरोना’ – नारायण राणे
Nana Patole : ‘महाराष्ट्राला लसीची नितांत गरज; केंद्र सरकार पाकिस्तानला मोफत लस देतंय’ !
अबू आझमींचा इशारा, म्हणाले -‘आम्ही सरकारसोबत,पण जनहितासाठी आंदोलन करु’
Lockdown बाबत प्रकाश आंबेडकरांनी केलं मोठं विधान, म्हणाले – ‘सरकारला आमची विनंती राहील की…’