मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन- कोरोना लसीच्या तुटवड्यावरून राज्यातील राजकारण चांगलच तापलं आहे. लसीच्या कमतरतेवरून केंद्र आणि राज्य सरकार यांच्या संघर्ष सुरू झाला आहे. ठाकरे सरकारमधील नेते आणि भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. महाराष्ट्राच्या बाबतीत लसीचे राजकारण सुरू झाले ते निर्घृण आहे असा आरोप शिवसेनेने सामनातून मोदी सरकारवर केला आहे. असे असतानाच स्वाभिमानी शेतकरी संघटनचे नेते राजू शेट्टी Raju Shetty यांनी केंद्र सरकारला थेट इशारा दिला आहे. येत्या 8 दिवसात महाराष्ट्राला लसीचा वाढीव पुरवठा मिळाला नाही, तर पुण्यातील सीरमच्या लसीचा एक थेंबही महाराष्ट्राबाहेर जाऊ देणार नाही, असे बजावले आहे.
राजू शेट्टी Raju Shetty यांनी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी पत्र लिहिले आहे. त्यात म्हटले आहे की, महाराष्ट्राला लवकरात लवकर लसींचा पुरवठा करण्यात यावा. येत्या 8 दिवसांत महाराष्ट्राला लसींचा वाढीव पुरवठा मिळाला नाही, तर आम्ही पुण्यातील सीरम इंस्टीट्यूटमधून एकही गाडी महाराष्ट्राबाहेर जाऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. दरम्यान राज्यभरात अनेक ठिकाणी शुक्रवारी कोरोना लसींचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवला. गुरुवारीच अनेक ठिकाणी डोस संपल्यामुळे लसीकरण थांबवले होते. शुक्रवारी विदर्भात अनेक जिल्ह्यांतील लसीकरण केंद्रे ठप्प पडली होती. पश्चिम महाराष्ट्रात पुणे वगळता परिस्थिती गंभीर असून तेथे हाताच्या बोटावर मोजण्याइतकी केंद्रे सुरू होती. उत्तर महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यातील बरीच केंद्रे बंद होती. लशींच्या तुटवड्यारुन भाजप नेते आणि ठाकरे सरकारमधील मंत्री यांच्यात शाब्दीक युद्ध सुरू आहे. मात्र महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती पाहता, राज्याला लसींचा मोठ्या प्रमाणात पुरवठा व्हावा, अशी जनेतची इच्छा आहे.
15 लाखांची लाच घेताना आयकर विभागातील 2 अधिकारी CBI च्या जाळ्यात
सरसंघचालक मोहन भागवत यांना कोरोनाची लागण, उपचारासाठी रूग्णालयात दाखल
मोहन भागवतांना कोरोना झाल्यानंतर अमोल मिटकरी म्हणाले – ‘आता भिडे गुरुजींना विचारा’
Pandharpur : अजित पवार भाजप नेत्यांवर गरजले, म्हणाले-‘अरे तुला कुठं….’
..अन्यथा ‘मराठवाडी’ च्या जलाशयात सत्याग्रह – नरेंद्र पाटील
गोंदिया : नागझिरा अभयारण्यात वणवा विझविताना तीन मजुरांचा होरपळून मृत्यु
MPSC परीक्षेबाबत राज ठाकरेंचा CM उद्धव ठाकरेंना फोन, केली ‘ही’ मागणी
अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ ! CBI कडून तपास सुरु, टीम NIA कार्यालयात दाखल
Gold Price Today : सोनं 250 रुपयांनी तर चांदी 360 रुपयांनी महागली !