अमरावती : सरकारसत्ता ऑनलाइन – अमरावती जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यासाठी आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्या प्रहार संघटनेतर्फे (Prahar Sanghatana) आंदोलन करण्यात आले होते. शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी यासाठी बच्चू कडूंच्या (Bacchu Kadu) संघटनेने दोन वेळा आंदोलन केले होते. त्याला यश येऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याचा दावा कडू यांनी केला आहे.
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
अमरावती येथे पत्रकारांसोबत बोलताना बच्चू कडू यांनी पत्रकारांना धारेवर धरले. तुम्ही संशोधन करत नाही, काही माहिती घेत नाही.
उठता आणि बोंब सुरु करता. शेतकऱ्याच्या खात्यावर दोन दिवस आधीच पैसे आले आहेत.
तुम्हाला माहित नाही, तर माझ्यासोबत चला, तुम्हाला खात्यात पैसे दाखवतो. कित्येकांच्या खात्यावर नुकसान भरपाईचे पैसे आले आहेत, हे तुम्हाला माहित नाही, मी तुम्हाला दाखवतो, असे कडू म्हणाले.
यावेळी पत्रकारांनी तुम्ही मंत्री केव्हा होणार, असा प्रश्न कडूंना विचारला असता, त्यावर त्यांनी मिश्किल उत्तर दिले.
मी काय प्रमुख आहे का, माझा लहानसा पक्ष आहे. जो शिंदे यांच्या सरकारमध्ये त्यांच्या पाठिशी उभा आहे.
त्यामुळे आगामी काळात कदाचीत अडीच वर्षांनी मला मंत्रिपद दिले जाईल, असे कडू म्हणाले.
Web Title :- Bacchu Kadu | MLA Bachu Kadu told reporters; Ask questions after taking the information, the money has been deposited in the farmer’s account two days ago
Nitesh Rane | ‘उद्धव ठाकरे संपलेला माणूस आहे, त्याच्यावर बोलून …’ नितेश राणेंचा प्रहार
Thank God Movie | अजय देवगणचा ‘थँक गॉड’ चित्रपट रिलीजपूर्वी ‘या’ कारणामुळे वादाच्या भोवऱ्यात
Pune ACB Trap | ठेकेदाराकडून 10 हजार रुपये लाच घेताना वनपरिमंडळ अधिकारी अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात