ठाणे : सरकारसत्ता ऑनलाइन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde ) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)
काल ठाण्यात एकाच कार्यक्रमात एकत्र आले होते. यावेळी दोन्ही नेत्यांनी आपल्या भाषणात केलेल्या जोरदार फटकेबाजीला उपस्थितांनी हशा आणि
टाळ्यांनी दाद दिली. ठाण्यात काल ऑल इंडिया बंजारा सेवा संघाने (All India Banjara Seva Sangh) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath
Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. या सोहळ्याला बंजारा समाज बांधव मोठ्या संख्येने
उपस्थित होते.
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी फक्त ट्रेलर म्हणून काम करतो, मुख्यमंत्री आल्यावर चित्रपट सुरू होतो. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मी दिलेला शब्द पूर्ण करणारा व्यक्ती असल्यानेच आज माझ्या मागे 50 आमदारांची ताकद उभी राहू शकली. शिंदे पुढे म्हणाले की, आज एका मोठ्या ताकदीच्या रूपात ठाण्यात बंजारा समाज एकत्र आलेला आहे. जंगल आणि निसर्ग संपदेत राहणारा हा समाज आपल्या राज्याचे भूषण आणि वैभव आहे.
बंजारा समाजाचे कौतुक करताना मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) म्हणाले, या समाजाने राज्याच्या विकासात मोठे योगदान दिले आहे. या समाजातील व्यक्तींनी राज्याच्या विकासाला चालना दिली. जिद्द, चिकाटी आणि मेहनत केल्याने हा समाज विकासाच्या मुख्य प्रवाहात येत आहे. शिक्षण आरोग्य या सेवेपासून वंचित राहिलेला हा समाज आहे. आता कुठेही हा समाज मागे राहणार नाही. कारण तुमचे सरकार राज्यात आले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, बंजारा समाजाने नेहमीच आपल्या गाण्याने आणि नृत्याने आपले वेगळेपण जपले आहे.
या समाजावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचेही विशेष प्रेम आहे.
जुने पूर्वीचे बंजारा समाजाचे लमा मार्ग होते, त्या मार्गांवरून आज राष्ट्रीय महामार्ग झाले आहेत.
गावा खेड्यात ज्या काही विहिरी आज दिसून येतात, ती बंजारा समाजाचीच देण आहे.
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
Web Title :- CM Eknath Shinde | bjp devendra fadanvis and cm eknath shinde speech in thane program
Andheri By Election | अंधेरीत शिवसेनेचा विजय सोपा, अखेर भाजपकडून उमेदवारी अर्ज मागे