नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Sanjay Raut | आज दिल्ली येथे आयोजीत पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेनेच्या शिंदे गटावर सडकून टीका केली आहे. उद्या सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. त्यासाठी दिल्ली येथे संजय राऊत (Sanjay Raut) दाखल झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना शिंदे-फडणवीस सरकारबाबत सवाल केला असता. त्याबाबत काय बोलायचे हे घटनाबाह्य सरकार आहे अशी टीका केली.
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
यावेळी बोलताना संजय राऊत(Sanjay Raut) म्हणाले की, सध्याचे सरकार हे घटनेची पायामल्ली करीत सत्तेत आले आहे. तसेच हे घटनाबाह्य सरकार एक दिवसही सत्तेत राहता कामा नये. न्यायव्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास असून न्यायालयाकडे आम्ही मोठ्या अपेक्षेने पाहत आहोत. आमचा घटनेवर पूर्ण विश्वास आहे. कोर्टाकडून आम्हाला न्याय मिळेल. तसेच घटनेचा हातोडा या सरकारवर पडल्याशिवाय राहणार नाही. असे देखील यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले.
यादरम्यान, बोलताना त्यांनी केंद्र सरकारवर देखील निशाना साधला. या देशात काही नवं घडणार नाही. महाराष्ट्राचा केंद्रात अपमान होत आहे. तसेच जरी केंद्रात फेरबदल झालेच तरीही तेच पत्ते पिसले जाणार म्हणत त्यांनी केंद्र सरकारच्या कार्यशैलीवर जोरदार टीका केली. राज्यात सुडाचे राजकारण सुरू आहे. असेही यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले.
दरम्यान, महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.
पाच न्यायामूर्तींच्या घटनापीठाऐवजी सात न्यायामूर्तींच्या घटनापीठापुढे या प्रकरणाची सुनावणी व्हावी अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली होती.
त्यामुळे त्यावर सुप्रीम कोर्ट काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.
तसेच उद्याच्या सुनावणीत याप्रकरणी तोडगा निघणार की हे प्रकरण सात न्यायामूर्तींच्या घटनापीठाकडे वर्ग
करण्यात येणार हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (Sanjay Raut)
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
Web Title :- Sanjay Raut | Shivsena MP sanjay raut once again criticizes shinde fadnavis government
Rashi Khanna | अभिनेत्री राशी खन्नाच्या निखळ सौंदर्याने चाहते थक्क; फोटोवर कौतुकांचा वर्षाव