IMPIMP

”अहमदनगर जिल्ह्याचे ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर’ असे नामांतर करा”

by sikandershaikh
Demand-of-rename-of-ahmednagar

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनअहमदनगर जिल्ह्याचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (ahilya devi holkar) नगर असे नामांतर करा, अशी मागणी अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज भूषणसिंह राजे होळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात भूषणसिंह राजे होळकर यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र दिले आहे.

मुख्यमंत्री ठाकरे यांना दिलेल्या पत्रात होळकर यांनी म्हटले आहे की,  कुशल प्रशासन आणि आदर्श न्यायव्यवस्थेच्या जोरावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (ahilya devi holkar) यांनी रयतेच्या जगण्यात खऱ्या अर्थाने राम आणला. अशा या महान व प्रेरणादायी पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे माहेर अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथे आहे. महाराष्ट्रात जन्माला येणाऱ्या अहिल्यादेवींनी देशाला नवी दिशा दिली.

त्यांच्या महान स्मृतींपुढे नतमस्तक होऊन अहिल्यादेवींवर निष्ठा असणाऱ्यांच्या लोकभावनेचा सन्मान ठेवत अहमदनगर जिल्ह्याचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर असे नामांतर करावे.  शेवटी आपण कोणत्या इतिहासाचा वारसा सांगणार ? जुलमी राजवटीचा की पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा ?  हे महाराष्ट्राततील जनतेने ठरवले आहे. आता निर्णय तुमचा आहे, असे देखील होळकर यांनी मुख्य़मंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

Related Posts