IMPIMP

लसीवरून संजय राऊतांची पुण्याच्या महापौरांवर टीका, म्हणाले -‘त्यातील खोटारडेपणा सिद्ध झाला’

by Team Deccan Express
coronavirus update lockdown update sanjay raut narendra modi

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना कोरोना रुग्णसंख्या, लॉकडाऊन, कोरोना लस यांवर भाष्य करत विरोधकांवर टीकास्त्र सोडले. संजय राऊत म्हणाले, देशात कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. मात्र देशाच्या राज्यकर्त्यांनी कोरोनाला गांभीर्याने घेतल्याचे दिसत नाही. सध्या पश्चिम बंगालमध्ये निवडणूका होत आहे. त्या ठिकाणी कोरोना नाही असे नाही. मात्र याचे भयावह चित्र निवडणुकीनंतर समोर येईल, असे म्हणत राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. तसेच पश्चिम बंगालमधील निवडणूका पार पडल्यानंतर पंतप्रधान लॉकडाऊनचा निर्णय घेऊ शकतात, असेही राऊत यांनी म्हटले आहे.

‘फडणवीसांच्या काळात 14 मंत्र्यांवर गंभीर आरोप होऊनही नैतिकतेनं सत्तेशी जणू ‘लव्ह जिहाद’ पुकारला होता’, संजय राऊतांचा टोला

राज्यातील परिस्थिती बिकट होत आहे

संजय राऊत (sanjay raut) पुढे म्हणाले, सध्या देशांतर्गत युद्ध आहे. सरसंघचालक मोहन भागवत, भैय्याजी जोशी कोरोनाग्रस्त आहेत, याची माहिती फडणवीस यांना असेल. मोठ्या व्यक्ती, महाराष्ट्रातील जनता कोरोनाशी लढा देत आहे. महाराष्ट्राचे म्हणून एकत्र आले पाहिजेत. आपल्याला कोरोना होणार नाही आणि विरोधकांनाच तो होईल हे सत्ताधारी आणि विरोधकांनी डोक्यातून काढून टाकले पाहिजे. देशातील परिस्थिती सध्या हाताबाहेर गेली आहे. राज्यातली परिस्थिती बिकट होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याचं गांभीर्य सर्वांना समजावून सांगत लॉकडाऊनचे संकेत दिले की, लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही. ही स्थिती संपूर्ण देशाचीच आहे. देशपातळीवर असा निर्णय घेण्याबद्दल पावलं टाकली जात आहेत का ? असं चित्र मला दिसत असल्याचे राऊत यांनी म्हटले.

गुजरात भाजप ऑफिसमधून रेमडेसिवीर इंजेक्शनचे मोफत वाटप, नवाब मलिकांचा गंभीर आरोप

म्हणून माणसं मारता येणार नाहीत

केंद्र सरकारवर निशाणा साधताना राऊत म्हणाले, प्रत्येक वेळी केंद्र आपल्या पक्षाचे (भाजप) हित बघून अशा प्रकारचे निर्णय घेत असल्याचे पहायला मिळत आहे. देशात सध्या निवडणुका आहेत. हा पक्ष निवडणुकीत उतरला आहे. प्रचार सुरु आहे, असं म्हणून माणसं मारता येणार नाही. धर्म, जात, निवडणुकांपेक्षा लोकांचा जीव महत्त्वाचा आहे. निवडणुका कधीही घेता येतील, राजकारण कधीही करता येईल, लोकांचा जीव महत्त्वाचा आहे. सध्या पश्चिम बंगालमध्ये निवडणुका सुरु आहेत. त्या ठिकाणी कोरोना नाही असे वाटते का, याचे भयावह चित्र निवडणुकीनंतर दिसेल. मात्र याचे गांभीर्य देशाच्या राज्यकर्त्यांना नाही. हे आम्ही गांभीर्याने घेत आहोत इतरांनी देखील घेतले पाहिजे. आमचं-तुमचं हे त्यांना शोभत नाही आणि आम्हाला. फडणवीस यांनी बैठकीत मत मांडताना सांगितले की, लोकांना लॉकडाऊन नको आहे, मग तुम्ही पर्याय सांगा ? लोकांना लॉकडाऊन नको आहे हे सरकारला माहिती नाही का ? असंही राऊत यांनी म्हटले.

प्रकाश जावडेकरांच्या ‘ज्ञानामृता’ची महाराष्ट्राला गरज नाही, संजय राऊतांची टीका

पुण्याच्या महापौरांवर टीका

संजय राऊत यांनी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यावर टीका करताना म्हटले की, जास्तीत जास्त लसीकरण… रेमडेसिवीरचा मुबलक साठा उपलब्ध करुन देणे हे केंद्र सरकारचे कर्तव्य आहे. त्याचे खापर कोणत्याही राज्यावर फोडू नका. जसं पुण्यात महापौरांचं प्रकरण झालंय. केंद्राकडून लसी आणल्या. मग केंद्राकडून आणल्यात, तर मुंबईलाही पाठवा. त्यातील खोटारडेपणा सिद्ध झाला, असे म्हणत राऊत यांनी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यावर टीका केली.

Read More : 

सचिन वाझे प्रकरणावरुनही उदयनराजे आक्रमक, म्हणाले, ‘हा कोण वाझे…’

 

संजय राऊतांनी फडणवीसांना दिला सल्ला, म्हणाले – ‘प्रसंग बाका, सरकार कोणाचं हे पाहू नका, दिल्लीतून महाराष्ट्राला मदत मिळवून द्या’

15 लाखांची लाच घेताना आयकर विभागातील 2 अधिकारी CBI च्या जाळ्यात

 

Balasaheb Thorat : ‘राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या आरोपांना महत्व देत नाही’

राज्यात 30 एप्रिलपर्यंत संपूर्ण Lockdown ? मुख्यमंत्र्यांनी बोलाविलेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर
होऊ शकतो निर्णय

खा. विनायक राऊतांचा राणेंवर ‘निशाणा’, म्हणाले – ‘कोकण सम्राटां’ नी चिपी विमानतळाचं कंत्राट दळभद्री कंपनीला देऊन वाट लावली

Related Posts