मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – महाराष्ट्राचे राजकारण विरोधी पक्षाच्या हातात गेले आहे काय, अशी शंका आता येत आहे. 36 दिवसांत महाराष्ट्रातील दोन मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला व आणखी एक मंत्री घरी जातील, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. दोन मंत्र्यांनी राजीनामा दिला तो नैतिकतेच्या मुद्यांवर, पण फडणवीसांच्या सरकारच्या काळात 14 मंत्र्यांवर गंभीर आरोप होऊनही नैतिकतेने सत्तेशी जणू ‘लव्ह जिहाद’ पुकराला होता, असा रोखठक टोला शिवसेनेचे नेते संजय राऊत sanjay raut यांनी लगावला आहे.
गुजरात भाजप ऑफिसमधून रेमडेसिवीर इंजेक्शनचे मोफत वाटप, नवाब मलिकांचा गंभीर आरोप
महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तीन पक्षांचे सरकार चालले आहे. मागील काही दिवासंपासून राज्यातील विरोधी पक्ष सरकारची प्रतिमा बिघडवण्याची एकही संधी सोडत नाही. या सगळ्या आरोपांवर सडेतोड उत्तर देणे गरजेचं आहे. नाहीतर विरोधी पक्षाचा खोटेपणा रोज रोज ऐकून लोकांना एक दिवस खरा वाटू लागेल, अशा शब्दात राऊत यांनी सरकारला सल्ला दिला आहे. सामनाच्या रोखठोक मधून राऊत sanjay raut यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.
‘वळसे-पाटील’ पॅटर्नने झाडाझडती होणे आवश्यक
माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे-पाटील यांनी आणखी एक महत्त्वाचा विषय समोर आणला. ते म्हणाले, शपथ घेतल्या दिवसापासून आघाडी सरकार हे सापाला दूध पाजतंय. आम्ही सांगून थकलो. आजपर्यंत कायदा विभागातील एक साधा वकील बदललेला नाही. एक नोकर दोन तत्त्वत: मताभिन्नता असलेल्या मालकाची प्रामाणिकपणे सेवा कशी करु शकतो ?असा प्रश्न माजी न्यायमूर्ती कोळते पाटील यांना पडला असेल तर त्यांचे समाधान व्हायला हवे. तेच अत्यंत स्पष्टपणे नवे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनीही पहिल्याच दिवशी सांगितले, पोलीस अधिकाऱ्यांच्या निष्ठा नक्की कोठे आहे ? ते तपासून घ्यावे लागेले. हे फक्त विधी, न्याय व गृहखात्यापुरतेच नाही, तर संपूर्ण प्रशासनाचीच ‘वळसे-पाटील’ पॅटर्नने झाडाझडती होणे आवश्यक आहे, असे राऊत sanjay raut म्हणाले.
सचिन वाझे प्रकरणावरुनही उदयनराजे आक्रमक, म्हणाले, ‘हा कोण वाझे…’
15 लाखांची लाच घेताना आयकर विभागातील 2 अधिकारी CBI च्या जाळ्यात
Balasaheb Thorat : ‘राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या आरोपांना महत्व देत नाही’
सरसंघचालक मोहन भागवत यांना कोरोनाची लागण, उपचारासाठी रूग्णालयात दाखल
मोहन भागवतांना कोरोना झाल्यानंतर अमोल मिटकरी म्हणाले – ‘आता भिडे गुरुजींना विचारा’