मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्यात कोरोनाचे थैमान सुरु असून, रुग्णसंख्याही झपाट्याने वाढत आहे. त्यानुसार, आता प्रशासनाकडून पुन्हा कडक निर्बंध लागू केले जात आहेत. तर दुसरीकडे माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून दिली जात आहे. त्यावरून आता भाजप खासदार नारायण राणे narayan rane यांनी टोला लगावला. ‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी म्हणणारे मुख्यमंत्री फेल झाले आहेत. त्यांच्याच घरात कोरोनाचा शिरकाव झाला’.
Nana Patole : ‘महाराष्ट्राला लसीची नितांत गरज; केंद्र सरकार पाकिस्तानला मोफत लस देतंय’ !
कोरोना व्हायरसचा जेव्हापासून संसर्ग वाढत गेला. तेव्हापासून मुख्यमंत्री ठाकरे यांनी माझे कुटुंब, माझी जबाबदारी अशी घोषणा केली होती. त्यावरून नारायण राणे narayan rane यांनी निशाणा साधला. ते म्हणाले, ‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबालाच कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला. त्यामुळे ते ही जबाबदारी पेलण्यात अपयशी ठरले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी आणि मुलाला कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला. तसेच मुख्यमंत्र्यांच्या चुकीच्या धोरणामुळेच राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढला. वर्षभरात 18 हजार बेड्स उपलब्ध करू शकले नाहीत. देशातील आणि इतर राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाली. मग महाराष्ट्रातच का रुग्णसंख्या वाढत आहे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
Tejashwi Yadav : ‘निवडणूक आयोग बरखास्त करा अन् कारभार भाजपच्या हाती द्या’
लॉकडाऊनच्या धमक्या दिल्या जाताहेत
लॉकडाऊनला राज्यभरातून विरोध होत आहे. मात्र, लॉकडाऊनच्या धमक्या दिल्या जात आहेत. पण गरिबांच्या पोटापाण्याच्या प्रश्नावर काहीही बोलत नाही. मी मातोश्रीवर बसतो आणि तुम्हीही तुमच्या घरात बसा. नागरिकांना मान सन्मान देऊन बोलायला हवे, असेही नारायण राणे narayan rane म्हणाले.
‘जेटली आणि सुषमा स्वराज यांचा मृत्यू मोदींनी केलेल्या छळामुळेच’ – द्रमुक नेत्याचे विधान
‘त्या’ विधानावरुन संजय राऊतांचा ‘यू-टर्न’, म्हणाले -‘मी तसे काही म्हणालोच नाही’
‘कोरोना’चा कहर रोखण्यासाठी ठाकरे सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत?
‘कोरोना’च्या नावाखाली सुरु असलेला ‘तमाशा’ बंद करा; काँग्रेसच्या नेत्याचे वक्तव्य