पाटणा : भाजप उमेदवाराच्या गाडीमध्येच ईव्हीएम मशिन्स सापडल्याचा धक्कादायक प्रकार आसाममध्ये नुकताच समोर आला. त्यावरून भाजपवर टीका केली जात आहे. त्यातच आता राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि बिहारचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव tejashwi yadav यांनी निशाणा साधला. ‘निवडणूक आयोग कशाला हवा? निवडणूक आयोगाऐवजी सर्व कारभार थेट भाजपच्या हाती द्यावा, अशी टीका केली.
आसाम विधानसभेच्या 39 जागांसाठी मतदान झाले. मतदान संपल्यानंतर रात्री भाजप उमेदवाराच्या गाडीमध्येच मतदानासाठी वापरल्या जाणाऱ्या ईव्हीएम मशिन्स सापडल्या. त्यानंतर सर्वच विरोधी पक्षांकडून भाजपवर टीका केली जात आहे. निवडणूक आयोगाने याबद्दल स्पष्टीकरणही दिले आहे. पण आता तेजस्वी यादव यांनी यावर ट्विट केले आहे. त्यामध्ये त्यांनी निवडणुक आयोगासाठी वापरल्या जाणाऱ्या ECI चा शॉर्टफॉर्म आपल्या ट्विटमध्ये विश्वासार्हता संपत चाललेले आयोग असा केला आहे. अशाप्रकारे पडद्यामागून काम करण्यापेक्षा थेट निवडणूक आयोग बरखास्त करावे आणि त्याचा संपूर्ण कारभार भाजपाच्या हाती द्यावा, असेही तेजस्वी tejashwi yadav यांनी सांगितले.
Devendra Fadnavis : ‘दीपाली चव्हाण प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा, उज्ज्वल निकमांची नियुक्ती करा’
तसेच बिहारमध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकाही निवडणूक आयोगानेच स्वार्थ साधण्यासाठी ताब्यात घेतली. यासाठी त्यांना प्रशासनातील लोकांनी मदत केली आणि भाजप व संयुक्त जनता दलाचा (JDU) विजय झाला, असा गंभीर आरोप तेजस्वी यादव tejashwi yadav यांनी केला. तसेच पडद्यामागून काम करण्यापेक्षा थेट निवडणूक आयोग बरखास्त करावे, असेही ते म्हणाले.
‘जेटली आणि सुषमा स्वराज यांचा मृत्यू मोदींनी केलेल्या छळामुळेच’ – द्रमुक नेत्याचे विधान
‘त्या’ विधानावरुन संजय राऊतांचा ‘यू-टर्न’, म्हणाले -‘मी तसे काही म्हणालोच नाही’
‘कोरोना’चा कहर रोखण्यासाठी ठाकरे सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत?
‘कोरोना’च्या नावाखाली सुरु असलेला ‘तमाशा’ बंद करा; काँग्रेसच्या नेत्याचे वक्तव्य