IMPIMP

शिवसेनेचा भाजपला इशारा ! सांगली-जळगावात ‘करेक्ट’ कार्यक्रम ही तर ‘नांदी’

by pranjalishirish
shiv sena saamana editorial on sangli jalgaon municipal election bjp

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – सांगली महापालिकेत भाजपची सत्ता उलथून लावल्यानंतर जळगाव महापालिकेतही भाजपाला सत्तेतून पाय उतार व्हावे लागले. यावरून शिवसेनेने भाजपवर निशाणा साधला आहे. शिवसेनेनं Shiv Sena मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात सांगली जळगावात करेक्ट कार्यक्रम झाला आहे. हि तर नांदी असल्याचे सांगत यापुढेही असे अनेक कार्यक्रम होतील असे म्हणत शिवसेनेनं भाजपला इशारा दिला आहे. दरम्यान नैतिक अधिष्ठान नसतानाही सांगली जळगावात सत्ता बदल झाले त्यामुळे भाजपने नैतिक किंवा अनैतिक यावर बोलण्याचा अधिकार गमावल्याचेही शिवसेनेनं म्हंटल आहे.

मुलीला वडिलांच्या दुसऱ्या लग्नाबाबत सवाल उपस्थित करण्याचा अधिकार, मुंबई HC चा महत्वपूर्ण निकाल

जयंत पाटील यांनी सांगली महापालिकेत भाजपचा करेक्ट कार्यक्रम केला. तेथील पालिकेतील भाजपची सत्ता उलथवून राष्ट्रवादीचा महापौर केला. विशेष म्हणजे वाऱ्याची दिशा पाहून भाजपाच्या १७ नगरसेवकांनी मतदान केले. आता त्यापेक्षा करेक्ट कार्यक्रम जळगाव महानगरपालिकेतही झाला. येथेही वाऱ्याची दिशा ओळखून भाजपच्या २७ नगरसेवकांनी शिवसेनेचा Shiv Sena महापौर व्हावा यासाठी मतदान केले. अशा पद्धतीने सांगलीपाठोपाठ जळगावात भाजपचा गड पडला आहे. जळगावात महापौर आणि उपमहापौर शिवसेनेचाच झाल्याने उत्तर महाराष्ट्राचे स्वयंभू बादशहा गिरीश महाजन यांना जबर धक्का बसल्याचे शिवसेनेने म्हटलं आहे.

धनंजय मुंडेंची पंकजा मुंडें वर जहरी टीका; म्हणाले – ‘हा तर पळकुटे पणा’

काय म्हंटल आहे सामनाच्या अग्रलेखात
एकनाथ खडसे यांनी त्यांच्या राजकारणाची, तसेच जळगाववरील वर्चस्वाची चुणूक दाखवली आहे.एकापाठोपाठ एक भाजपचा फुगा फुटू लागला आहे. मधल्या काळात महाराष्ट्रात भाजपला तात्पुरती सूज आली होती. ही सूज म्हणजे पक्षाची वाढ आहे असा गैरसमज काही मंडळीनी करून घेतला. त्यातून अहंकाराचे वारे भाजप नेत्यांच्या कानात शिरले. त्या अहंकाराचा पाडाव जळगावात झाला. एकनाथ खडसे व गिरीश महाजन यांच्यात राजकीय वितुष्ट आहे. खडसे यांनी भाजप सोडला त्यामागची जी कारणे आहेत त्यातले प्रमुख कारण गिरीश महाजन हे एक आहेच. भाजपचा बालेकिल्ला जळगाव कधीच नव्हता.इकडचे तिकडचे लोक फोडून महाजन यांनी महानगरपालिकेत भाजपची सत्ता आणली. महाजन यांचा कारभार एकतंत्री व अहंकारी होता. त्यामुळेच भाजप नगरसेवक कंटाळले होते. महाजन यांचा अहंकार इतक्या टोकाचा की आपल्यात संपूर्ण क्षमता आहे, पक्षाने जबाबदारी दिली तर बारामतीतही विजय मिळवून दाखवतो, अशी भाषा ते करू लागले. इतरांना तुच्छ लेखण्याचा त्यांचा स्वभावच जळगावात भाजपाला घेऊन बुडाला आहे अशी टीका शिवसेनेने Shiv Sena केली आहे.

…म्हणून संजय राठोड यांच्या गाडीसमोर तरुणाने घातले ‘लोटांगण’

भाजपची महाराष्ट्रात सत्ता पाच वर्षे होती. त्या सत्तेतून पैसा व पैशांतून सर्व स्तरांवरील सत्ता विकत घेण्यात आल्या. भाजपने नवा सिद्धांत रुजवला तो म्हणजे पैसे फेकले की सर्व विकत मिळते. पण महाराष्ट्रात १०५ आमदार निवडून येऊनही भाजपला राज्याची सत्ता मिळवता आली नाही. सत्ता गेली की अक्कल जाते, अक्कल गेली की भांडवल जाते, भांडवल गेले की कुंपणावरचे कावळे उडून जातात. याचा अनुभव सध्या भाजप घेत आहे. या अनुभवांतून त्यांना शहाणपण आले तर उत्तमच. सांगली-जळगावात भाजपचा कार्यक्रम एकदम करेक्ट झाला. राज्यात इतर ठिकाणीही अशा करेक्ट कार्यक्रमांचे नियोजन योग्य वेळी होईल. शेवटी सत्ता हेच हत्यार असते व सत्ता हीच संकटमोचक, कवचकुंडले ठरतात. बाकी सारे अहंकार, गर्व व्यर्थ ठरतात. वाऱ्यावरची वरात वाऱ्याच्या झुळकीबरोबरच नष्ट होते. घाऊक पक्षांतरे करून भाजपने महाराष्ट्रात पक्ष उबदार व गुबगुबीत केला, पण त्याचा पाया भक्कम नव्हता हे आता दिसून आले, असं शिवसेनेने म्हटलं आहे.

1 जूननंतर हॉलमार्कशिवाय होणार नाही सोन्याची विक्री, फक्त ‘या’ 3 गुणवत्तेचेच दागिने विकण्यात येणार

भाजपचे नागपूर, पुण्याचे परंपरागत गड पदवीधर, शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत पडले. तेथे तर लोकांचे थेट मतदान होते. भाजपच्या हातातून वाळू सरकत असल्याचे तेव्हाच स्पष्ट झाले होते. येथील लोकांच्या मनातले भय महाराष्ट्रात ‘ठाकरे सरकार’ आल्यापासून नष्ट झाले. त्यामुळे लोक निर्भय बनून मतदान करीत आहेत. ई.डी., आयकर विभागाचे भय सामान्य माणसांना असण्याचे कारण नाही. आतापर्यंत हे भय दाखवूनच भाजपने राजकीय स्वार्थ पाहिला. ग्रामपंचायतीपासून विधानसभेपर्यंतच्या निवडणुका पोलीस यंत्रणेचा वापर करून जिंकल्या. ते भयच आता उरले नसल्याने लोक मुक्तपणे संचार करू लागले आहेत. हा शेवटी सत्तेचाच महिमा असतो. भाजपने हे महिमामंडन केले. त्यामुळे भाजपला आता महाविकास आघाडीकडे बोट दाखवून आदळआपट करण्याची गरज नाही, असंही शिवसेनेने म्हंटल आहे.

Aslo Read : 

‘…मग तुमच्या काळात काय दहशतवादी कृत्य, खंडण्या वसूल करायला अधिकारी नियुक्त केले का ?’

मनसुख हिरेन प्रकरणी ATS च्या हाती महत्वाची माहिती, PI सुनील माने यांची चौकशी

गृहमंत्र्यांच्या गच्छंतीची चर्चा ! Home Minister पदासाठी राष्ट्रवादीतून समोर आलं वेगळंच नाव

‘मुंबईत मुकेश अंबानींसारख्या व्यक्ती असुरक्षित’, नारायण राणेंनी लिहीलं HM अमित शाहांना ‘लेटर’

महाराष्ट्राच्या Lockdown संदर्भात मुख्यमंत्र्यांनी केलं ‘हे’ विधान

जयंत पाटलांचा हल्लाबोल; म्हणाले – ‘देशाची अर्थव्यवस्था ICU मध्ये, केंद्रातील कुंभकर्ण सरकारला कधी जाग येणार?

नाना पटोलेंचा नितीन राऊत यांच्या ‘ऊर्जा’वर ‘डोळा’?

Related Posts