सरकारसत्ता ऑनलाईन टीम – बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत हा १४ जून २०२० रोजी बांद्रा येथील फ्लॅट मध्ये मृतावस्थेत आढळला होता. त्याच्या मृत्यूला ९ महिने पूर्ण झाले आहेत. पण अजूनही सुशांत आणि अंकिता यांच्या रिलेशनशिपची चर्चा होत आहे. सुशांत आणि अंकिताचे ankita lokhande २०१६ मध्ये ब्रेकअप झाले होते. पण हे ब्रेकअप कोणत्या कारणामुळे झाले हे अजून कोणालाच माहित नव्हते. पण आता अंकिताने ankita lokhande या ब्रेकअप होण्यामागचे कारण सांगितले आहे. तिने ‘बॉलिवूड बबल’ला दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. यामध्ये ती म्हणाली आज जो तो मला तू सुशांतला का सोडले? असा प्रश्न विचारात आहे पण या मागची खरी कहाणी कोणालाच माहित नाही आहे.
माझी कहाणी कोणालाच माहित नाही…
मी कोणावर आरोप करत नाही, पण माझी कहाणी कोणालाच माहित नाही आहे. सुशांतला काय पाहिजे ते सुशांतने पक्के ठरवले होते. त्याला त्याच्या करिअरमध्ये पुढे जायचे होते म्हणून त्याने माझ्याऐवजी करिअर निवडले आणि पुढे गेला. तो तर त्याच्या आयुष्यात पुढे निघून गेला पण मी अडीच वर्षे काय काय सहन केले, हे मलाच ठाऊक आहे. मी बेडवर नुसतीच पडून असायची. मी आता काय करू? आत्महत्या करू का? असे प्रश्न सतत डोक्यात सुरु राहायचे. तसेच लोक येऊन मला सुशांतसोबतचे फोटो डिलीट करायला, घरातून हटवायला सांगायचे. पण मला वेळ द्या, यातून बाहेर पडण्यासाठी मला थोडा वेळ हवा आहे असे मी त्यांना सांगायचे.
तेव्हा तुम्ही कुठे होता?
सुशांतच्या मृत्यूनंतर त्याच्या चाहत्यांनी अंकिताला खूप ट्रोल केले होते. अंकिताने सोडले नसते तर सुशांत आज जिवंत असता, असेसुद्धा काही ट्रोलर्स म्हणले. यावर बोलताना अंकिताने सांगितले माझे जेव्हा ब्रेकअप झाले तेव्हा हे लोक कुठे होते ? तो मला सोडून गेला, तेव्हा तुम्ही का बोलला नाहीत? असे सवाल तिने विचारले आहेत. आज सुशांत आपल्यात नाही आहे त्याच्याबद्दल माझ्या मनात अजिबात राग नाही असेदेखील ती म्हणाली.
मी त्याची वाट बघत होते…
मी त्याची खूप वाट पाहिली… पण तो परतलाच नाही. मी त्याला दोष देत नाही आहे. पण त्याने त्याचा मार्ग निवडला होता मग मी काय करायला हवे होते ? सुशांत या जगातून गेल्यानंतर मी पब्लिसिटीसाठी त्याच्या कुटुंबाशी जवळीक वाढवली, असासुद्धा आरोप काही लोकांनी केला होता. पण सुशांत आणि माझे ब्रेकअप झाल्यानंतरसुद्धा मी त्याच्या कुटुंबाशी नाते टिकवून ठेवले होते आणि अजूनही आहे. सुशांत आज नाही. पण मी आहे आणि मी त्याच्या कुटुंबाची अशीच काळजी घेत राहील. आणि मला सुशांतच्या कुटुंबाचा काही अचानक पुळका आलेला नाही, असे देखील अंकिताने म्हटले आहे.
Pandharpur : अजित पवारांच्या बैठकीला सभेचे स्वरूप, पोलिसांत FIR दाखल
‘हा’ कटाचाच भाग, शिवसेनेने सांगितला घटनाक्रम !
गृहमंत्री अनिल देशमुख यांचा तूर्तास राजीनामा नाहीच, राष्ट्रवादीने केले स्पष्ट
पंढरपूरसाठी जनतेच्या मनातीलच उमेदवार दिला आहे, अजित पवारांनी दिले स्पष्ट संकेत
पंढरपूरचा उमेदवार शरद पवार ठरवतील
‘महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याऐवजी केंद्र सरकारच बरखास्त केलं पाहिजे’
RJ : धान्याच्या कोठीमध्ये अडकले मुले, गुदमरून 5 जणांचा मृत्यू
राज्यात राष्ट्रपती राजवटीच्या मागणीवरून संजय राऊतांनी विरोधकांना फटकारलं ! म्हणाले…