IMPIMP

Amit Shah | ‘मोदी सरकारचे काही निर्णय चुकीचे असू शकतील, पण…’ – अमित शाह (व्हिडिओ)

by nagesh
Amit Shah | BJP leader and Union home minister amit shah narendra modi government ficci

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकेंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी मोदी सरकारचे (Modi government) काही निर्णय चुकीचे असू शकतील, परंतु त्यामागे असणारी सरकारची भावना मात्र स्वच्छ होती असं त्यांनी म्हटलं आहे. फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या (FICCI) 94 व्या वार्षिक संमेलनात अमित शाह (Amit Shah) बोलत होते. देशातील 130 कोटी लोकांचा लोकशाहीवरील (Democracy) विश्वास अजून वाढला आहे हेच मोदी सरकारचं सर्वात मोठं यश असल्याचंही यावेळी त्यांनी म्हटलं. देशाच्या विकासात (development) फिक्कीचं योगदान कौतुकास्पद असल्याचे त्यांनी म्हटले.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

 

 

अमित शाह (Amit Shah) म्हणाले की, निर्णय चुकीचा आहे असं होऊ शकतं. पण भावना मात्र चुकीची नव्हती. आमच्यावरील टीकाकारही गेल्या सात वर्षात देशात खूप मोठे बदल पहायला मिळाल्याचं मान्य करतात असेही त्यांनी यावेळी म्हटले. सरकारवर भ्रष्टाचाराचा कोणताही आरोप (Corruption allegation) लागलेला नाही. सर्वांशी सल्लामसलत केल्यानंतरच सर्व क्षेत्रांमध्ये सुधारणा (Improvement) करण्यात आल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

अमित शहा पुढे म्हणाले, कोरोना (Corona) संकटादरम्यान सरकारने असे अनेक निर्णय घेतले ज्याचा फायदा पुढील बऱ्याच काळापर्यंत होईल. अर्थव्यवस्था वेगाने पुढे जात असून देशाचा आर्थिक दर दुहेरी अंकी झाल्यास आश्चर्य वाटण्याचं कारण नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दीड वर्षाहून अधिक काळ 80 कोटी लोकांना प्रती व्यक्ती/दर महिना मोफत अन्न (Free food) देण्याचं काम भाजपच्या (BJP) मोदी सरकारने केले आहे. हे खूप मोठे काम असून, जगात कोणीही असं केलेलं नाही. भारताची अर्थव्यवस्था (Economy) वेगाने आपल्या मार्गावर येत असल्याचे शाह यांनी सांगितले.

 

 

FICCI चं कौतुक करताना अमित शाह म्हणाले, 1972 पासून आजपर्यंत देशाच्या विकासात फिक्कीचं योगदान आहे.
आता ते योगदान अनेक टक्क्यांनी वाढवण्यासाठी आपण सर्वांनी पुढे यावे आणि इतर क्षेत्रांचाही विचार करावा ही वेळ आली आहे.
फिक्कीसारख्या संघटना पुढे आल्या तरच आत्मनिर्भर भारताचं ध्येय पूर्ण होऊ शकते.

 

Web Title :- Amit Shah | BJP leader and Union home minister amit shah narendra modi government ficci

 

हे देखील वाचा :

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 52 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

MIDAS School of Entrepreneurship | मिडास स्कूल ऑफ आंत्रप्रेन्योरशिप पुणे मधील नवोदित उद्योजकांनी स्टार्ट अपच्या माध्यमातून आपल्या कल्पनांना वास्तवात उतरवत उद्योगविश्‍वात एक पाऊल ठेवले

Brahmastra Motion Poster | ‘ब्रम्हास्त्र’च्या मोशन पोस्टर लॉंन्च वेळी रणबीर कपूरनं केलं आलिया भट्टला अपमानित…

 

Related Posts