मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन– Coronavirus in Maharashtra | महाराष्ट्रात कोरोनाची चिंता लागून राहिली आहे. मागील काही दिवसांपासून मुंबईसह राज्यात कोरोना विषाणूचे (Coronavirus in Maharashtra) रुग्ण आढळून येत आहेत. दररोज बाधितांची संख्या आढळून आल्याने राज्याला चिंता लागून राहिली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी सुचक माहिती दिली आहे. ‘राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना लोकांकडून नियमांचे पालन होत नाहीये, त्यामुळे रुग्णसंख्या वाढत राहिली तर महाराष्ट्र लॉकडाऊनच्या दिशेने जाईल,’ असं नवाब मलिकांनी म्हटलं आहे.
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
‘ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये, विशेषकरून कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. कोरोनाला नियंत्रित करण्यासाठी सरकारने जी नियमावली तयार केली आहे, त्याचे लोकांकडून काटेकोरपणे पालन होत नाही आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. जर याच पद्धतीने रुग्णसंख्या वाढत राहिली तर निश्चितपणाने आपण लॉकडाऊनकडे जात आहोत काय, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.’ असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. (Coronavirus in Maharashtra)
काल (बुधवारी) राज्यात सुमारे 3 हजार 900 नव्या रुग्णांची (Corona Virus) नोंद झाली आहे.
तसेच, मुंबईतही दैनंदिन रुग्णांची संख्या वाढते आहे. परिणामी सक्रिय रुग्णांचा आलेख देखील चढता आहे.
शहर-उपनगरात काल (बुधवारी) सक्रिय रुग्णांची संख्या 8 हजार 60 वर पोहोचली आहे.
तर दिवसभरात 2 हजार 510 रुग्ण सापडले आहे. ही वाढती संख्या पाहता राज्यात चिंतेचे वातावरण आहे.
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
Web Title :- Coronavirus in Maharashtra | corona patients are rise people are not following rules maharashtra heading towards lockdown minister nawab malik
MP Sambhajiraje Chhatrapati | ‘देवेंद्रजी आपण उद्या मुख्यमंत्री, पंतप्रधानही व्हाल; पण…’