IMPIMP

Devendra Fadnavis | ‘आम्ही जे केलंय ते सगळं…’, महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत देवेंद्र फडणवीसांचे मोठं विधान (व्हिडिओ)

by nagesh
Devendra Fadnavis | BJP leader devendra fadnavis important statement about political crisis of maharashtra and supreme court verdict

वर्धा : सरकारसत्ता ऑनलाईन – महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) 16 मार्च रोजी सुनावणी पूर्ण झाली. राज्यातील
सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाकडून (Supreme Court) पुढील दोन ते तीन दिवसांत निकाल येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नेमका निकाल
कधी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना महाराष्ट्रातील
सत्तासंघर्षाबबात विचारले असता त्यांनी मोठं विधान केलं आहे. आम्ही पूर्णपणे आशादायी आहोत. काहीही होणार नाही. आम्ही जे काही केलं आहे ते
सगळं कायदेशीर केल्याचे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितलं.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

नेमकं काय म्हणाले फडणवीस?

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येण्याआधीच महाराष्ट्रातल्या काही राजकीय पंडित आणि काही पत्रकार यांनी निर्णय देऊन टाकला आहे. पुढचे कॉम्बिनेशनही करून टाकले. सरकारही तयार करुन टाकले. मला असं वाटतं की हे योग्य नाही. सर्वोच्च न्यायालय हे खूप मोठं न्यायालय आहे. शांतपणे निर्णयाची वाट बघावी. आम्ही पूर्णपणे आशादायी आहोत. काहीही होणार नाही. आम्ही जे काही केलं आहे ते सगंळं कायदेशीर आहे. त्यामुळे योग्य निर्णय येईल अशी आमची अपेक्षा आहे, असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले. ते वर्धा येथे पत्रकारांशी बोलत होते.

 

 

…तर गुन्हे दाखल करा

दरम्यान, कोर्टाचा निकाल येण्यापूर्वीच राजकीय नेत्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. तर विरोधकांकडून हे सरकार कोसळणार असल्याचा दावा केला जात आहे. विरोधकांच्या या दाव्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले कोर्टाच्या (Maharashtra Politics News) निकालापूर्वी जे सरकार कोसळणार असल्याचा दावा करत आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल करा अशी मागणी बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केली.

 

 

राजकीय घडामोडींना वेग

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल येत्या 15 तारखेपूर्वी सर्वोच्च न्यायालय देण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पडद्यामागे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. ठाकरे गटाचे (Thackeray Group) आमदार आदित्य ठाकरे (MLA Aaditya Thackeray) हे आज दुपारी अचानकपणे राजभवनात (Raj Bhavan) दाखल झाले. आदित्य ठाकरे राजभवनात दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Devendra Fadnavis | BJP leader devendra fadnavis important statement about political crisis of maharashtra and supreme court verdict

 

हे देखील वाचा :

Maharashtra Political Crisis | महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर उद्या निकाल, न्यायमूर्ती डी. वाय चंद्रचूड यांनी दिली माहिती

The Kerala Story To Make Tax Free Demand In Maharashtra | ‘द केरळ स्टोरी’ राज्यात करमुक्त करावा; भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांची मागणी

Maharashtra Political Crisis | शिंदे सरकार राहणार की जाणार? न्यायालयाच्या निकालापूर्वी विधानसभा अध्यक्षांचे महत्त्वाचं विधान

Maharashtra Politics News | ‘…तर ठाकरेंचे कपडे फाडणार’ नितेश राणेंच्या वक्तव्याला ठाकरे गटाचे प्रत्युत्तर, म्हणाले – ‘ठाकरेंचे कपडे फाडण्याचा दम…’

 

Related Posts