मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाचे रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. यावेळी राज्यातील विविध महत्त्वाच्या नेत्यांना आमंत्रित केले गेले आहे. यावेळी नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्यातील मार्गाचे उद्धाटन करण्यात येणार आहे. त्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला आहे. घनसावंगी येथे भरलेल्या मराठवाडा साहित्य संमेलनात ठाकरे बोलत होते. यावेळी उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) राज्यातील विविध मुद्द्यांवर भूमिका मांडली. त्यांनी समृद्धी महामार्गाचे उद्घाटन आणि महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न यावरून सरकारवर टीकास्र सोडले.
ठाकरे म्हणाले, नरेंद्र मोदी समृद्धी महामार्गाचे उद्घाटन करण्यासाठी येत आहेत. यावेळी ते राज्यपालांच्या सगळ्या विधानांवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करतील. छत्रपती शिवाजी महाराज कसे होते, बाळासाहेब ठाकरे कसे होते वगैरे बोलून आम्हाला टोमणे मारतील. कारण त्या महामार्गाचे नाव हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आहे. त्यावर कदाचित ते बोलतील. माझी त्यांना विनंती आहे की, पंतप्रधान म्हणून तुम्ही देशाचे पालक आहात. पालकासारखे बोला. महाराष्ट्र म्हणजे पालकाची भाजी आहे, असे बोलू नका. कुणीही यावे आणि आमची भाजी करावी एवढे आम्ही काही मिंधे नाही, असेही ते म्हणाले.
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
समृद्धी महामार्ग तर झालाच पाहिजे. पण, एका मोठ्या मार्गाचे उद्धाटन करत असताना
महाराष्ट्र आणि कर्नाटकचा रस्ता कर्नाटक जर महाराष्ट्रासाठी बंद करत असेल,
तर त्यावर तुम्ही काय बोलणार आहात? तुमची त्यावर भूमिका काय? असे प्रश्न उद्धव ठाकरेंनी उपस्थित केले.
ते आधी पंतप्रधानांनी सांगावे आणि त्यानंतर शिवसेना प्रमुखांचे नाव असलेल्या रस्त्याचे उद्घाटन करावे.
बाळासाहेब ठाकरे सीमाप्रश्नावर तीन महिने तुरुंगात राहिले होते.
त्यांनी बेळगाव, कारवार आणि निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे ही भूमिका घेतली होती.
पण, आज बाळासाहेबांची शिवसेना म्हणाऱ्या पक्षानेसुद्धा त्यांची भूमिका काय आहे, हे स्पष्ट केले पाहिजे,
असे ठाकरे यावेळी म्हणाले.
Web Title :- Uddhav Thackeray | uddhav thackeray slams pm narendra modi samruddhi mahamarg inauguration
E-Shram Card | 2 लाखांचा फायदा हवा, तर ताबडतोब बनवा ‘हे’ कार्ड; सरकार देत आहे आकर्षक स्कीम
Chandrakant Patil | औरंगाबादमध्ये चंद्रकांत पाटलांना ‘या’ संस्थेने दाखवले काळे झेंडे