मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – नाशिकमधील ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेनंतर आज विरार येथील कोव्हिड रुग्णालयाला hospital fire लागलेल्या आगीत 13 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विरार पश्चिम येथील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला मध्यरात्रीनंतर आग लागली होती. चार मजली असणाऱ्या रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली होती. यावेळी अतिदक्षता विभागात 17 कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत होते. त्यापैकी 13 रुग्णांचा या आगीत मृत्यू झाला.
विरारमध्ये hospital fire घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या एका वक्तव्यावरुन भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी संताप व्यक्त केला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना राजेश टोपे यांनी विरारमधील दुर्घटना राज्य सरकारच्या अंतर्गत बाब असून राष्ट्रीय स्तरावरील बातमी नसल्याचे म्हटले होते. यावरुन भाजपने टीका केली आहे.
Virar Hospital Fire : ‘महाराष्ट्रात कोविड मृत्यूतांडव सुरु, राजेश टोपेंना घरी बसवलं पाहिजे’
भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करत संताप व्यक्त करताना म्हटले, किती दगडाच्या काळजाची आहेत ही माणसं ? किती असंवेदनशील विधान आहे हे ! अहो किमान जे गेलेत त्यांच्याबद्दल दोन अश्रू ढाळा, दु:ख तरी व्यक्त करा त्यांच्या दुर्दैवी नातेवाईकांसाठी. राजेश टोपे तुमच्या निबरपणाचा धिक्कार असो, अशा शब्दांत भातखळकर यांनी राजेश टोपेंच्या वक्तव्याचा समाचार घेतला.
किती दगडाच्या काळजाची आहेत ही माणसं? किती असंवेदनशील विधान आहे हे!अहो किमान जे गेलेत त्यांच्याबद्दल दोन अश्रू तर ढाळा, दुःख तरी व्यक्त करा त्यांच्या दुर्दैवी नातेवाईकांसाठी. @rajeshtope11 तुमच्या निबरपणाचा धिक्कार असो. https://t.co/X7DSPX8Y5z
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) April 23, 2021
काय म्हणाले राजेश टोपे ?
पत्रकारांनी राजेश टोपे यांना पंतप्रधान मोदींसोबत होणाऱ्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर प्रश्न विचारला असता टोपे यांनी अनेक विषयांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा करणार असलो तरी विरार hospital fire दुर्घटना ही राष्ट्रीय बातमी नसल्याने आम्ही महापालिका स्तरावर आणि राज्य स्तरावर त्यासंदर्भात निर्णय घेऊन मदत करु, असे टोपे यांनी म्हटले. पंतप्रधान मोदींशी ऑक्सिजनसंदर्भात बोलणार आहोत, रेमडेसिविर संदर्भात देखील बोलणार आहोत. विरार रुग्णालयात घडलेली ही घटना राष्ट्रीय बातमी नाही. आम्ही राज्य सरकारच्या वतीने पूर्णपणे मदत करणार असल्याचे राजेश टोपे यांनी म्हटले आहे.
फडणवीसांवर थेट दिल्लीतून निशाणा; प्रियांका गांधींनी व्हिडिओ ट्विट करून म्हटले…
Coronavirus : देशात गेल्या 24 तासात 3 लाखांच्या जवळपास नवीन रुग्ण, 2 हजाराहून अधिक मृत्यू
धनंजय मुंडेंच्या सामाजिक न्याय विभागाची रेकॉर्डब्रेक कामगिरी, 2003 नंतर पहिल्यांदाच अशी कामगिरी
तेव्हा तुम्ही नागपुरी बांगड्या भरल्या होत्या का ? खडसेंच्या लेकीचा संतप्त सवाल