मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन : गेल्या वर्षी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लोकांना भेट देत नव्हते. मात्र, राज ठाकरे यांची गेल्या वर्षभरात अनेकांनी भेट घेतली. अनेकांनी त्यांचे गाऱ्हाणे मांडले. इतकेच नाही तर ‘कृष्णकुंज’ हा मंत्रालयाचा दुसरा पत्ता झाला होता, अशी टीका मनसेचे नेते संदीप देशपांडे Sandeep Deshpande यांनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे. तसेच मुख्यमंत्र्याबद्दलची जनतेच्या मनातील विश्वासार्हता कमी झाली, असेही ते म्हणाले.
‘महाराष्ट्राच्या वाट्याला किती शून्य आले हे फडणवीसांनी सांगावे’; आव्हाडांचा टोला
संदीप देशपांडे Sandeep Deshpande यांच्याकडून सातत्याने मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर टीका केली जात आहे. यापूर्वी बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या भूमिपूजन कार्यक्रमाचे निमंत्रण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिले नव्हते, यावरूनही त्यांनी टीका केली होती. त्यानंतर आता देशपांडे Sandeep Deshpande यांनी पुन्हा एकदा निशाणा साधला. ते म्हणाले, ‘मुख्यमंत्रिसाहेब, तुमचे ऐकले, आता आमचे ऐका. कोरोना परिस्थिती, लॉकडाऊनची टांगती तलवार, आरोग्य यंत्रणा यावरून त्यांनी टीका केली. जनतेला लॉकडाऊनची भीती दाखवली जात आहे. लॉकडाऊनच्या भीतीमुळे व्यापारी शेतकऱ्यांना कमी किंमत देत आहेत.
CM उद्धव ठाकरेंनी घेतला राज ठाकरेंचा समाचार, म्हणाले…
तसेच आमच्यावर टीका करण्याचा तुम्हाला अधिकार नाही. तुम्ही घरी बसून होता आणि राज ठाकरे जनतेला भेटत होते. गेल्या वर्षभरात राज ठाकरे लोकांना भेटत होते. त्यामुळे ‘कृष्णकुंज’वर गर्दी वाढत होती. राज ठाकरे यांचे निवासस्थान ‘कृष्णकुंज’ हा मंत्रालयाचा दुसरा पत्ता झाला होता, असेही ते म्हणाले.
राज्यातील ‘या’ 8 जिल्ह्यात कठोर निर्बंध लावणार; आरोग्यमंत्र्यांचे संकेत
जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली
मोदी सरकारच्या निर्णयावर शिवसेनेची टीका; म्हणाले – ‘हा तर धक्कादायक विनोद !’
Photos : ‘ही’ Hot मॉडेल लढवणार जौनपूर पंचायत निवडणूक !
Lockdown बाबत प्रकाश आंबेडकरांनी केलं मोठं विधान, म्हणाले – ‘सरकारला आमची विनंती राहील की…’
अनेक ख्यातनाम विचारवंताचे गृहमंत्री अनिल देशमुखांना पाठबळ, म्हणाले…
शिवसेनेकडून भाजपला टोला, म्हणाले – ‘किमान, व्याजदर कपातीचा दांडपट्टा तरी चालवू नका