IMPIMP

CM Eknath Shinde | सत्तासंघर्षावर मुख्यमंत्र्यांना नाना पाटेकरांचा थेट प्रश्न…रागावू नका पण अडीच वर्ष का लागली? शिंदे म्हणाले…

by nagesh
Sanjay Raut | maharashtra in unsafe state in country say sanjay raut allegation shinde government

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन  – रागावू नका पण अडीच वर्ष का लागली? सत्तासंघर्षावर असा थेट प्रश्न अभिनेते नाना पाटेकर (Actor Nana
Patekar) यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना विचारला. यावर शिंदे म्हणाले, अडीच वर्ष म्हणजे त्यासाठी योग, वेळ,
काळ पाहिजे ना? मध्ये कोविड होता. मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात अभिनेते नाना पाटेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)
आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची मुलाखत घेतली. यावेळी शिंदे बोलत होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

शिवसेनेमध्ये उभी फूट पाडून बाहेर पडलेला शिंदे गट (Shinde Group) आणि भाजपाने (BJP) एकत्र येत सरकार स्थापन केल्याच्या पार्श्वभूमीवर यावेळी नाना पाटेकर यांनी शिंदे-फणवीस यांना अनेक प्रश्न विचारले. मुलाखतीच्या सुरुवातीलाच नाना पाटेकर यांनी, कोणीही उत्तर द्यावे, मतदार म्हणून आम्हाला किंमत आहे का? (Actor Nana Patekar) असा थेट प्रश्न विचारला. यावर उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आमची किंमत तुमच्या भरोश्यावर ठरते. तुमची किंमत कमी झाली तर आमची कशी राहील? असा प्रतिप्रश्न केला. यावर नानांनी, हे बोलण्यापुरते झाले. एकदा मत दिल्यानंतर पाच वर्ष आम्ही खिजगणतीत नसतो का? असा प्रश्न विचारताच प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या.

 

प्रेक्षकांनी टाळ्या वाजवताच नाना म्हणाले, गैरसमज टाळा हा प्रश्न कोणाला अडचणीत आणण्यासाठी, टाळ्या मिळवण्यासाठी नाही. एक सामान्य व्यक्ती म्हणून मनात आलेले प्रश्न विचारत आहे. एक मतदार म्हणून माझ्या मनात असते की तुम्ही या या गोष्टी कराव्यात. उद्धव (Uddhav Thackeray) आणि तुम्हाला मत दिले काय किंवा शरदरावांना (Sharad Pawar) दिले काय किंवा इतर कोणालाही दिले काय. मतदार (Voter) म्हणून जे वाटते ते तुम्ही केले नाही तर आम्ही काय करायचे ते सांगा. पाच वर्षानंतर आम्ही करुच पण त्या आधी काय करायचे?

 

नानांच्या या प्रश्नावर मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले, नानांनी भावना व्यक्त केल्या ते अगदी योग्य आहे. आम्ही तीन महिन्यांपूर्वी मतदारांचा आदार करुन जे काही करायचे ते केले.
जो आदर 2019 मध्ये व्हायला हवा होता. तुमचे म्हणणे बरोबर आहे आम्ही शिवसेना-भाजपा युती
(Shivsena-BJP Alliance) म्हणून लढलो. मतदारांनी बहुमत दिले.
भाजपाचे 100 च्या वर आले आमचे 56 आले.
सगळ्या मतदारांनाही वाटले होते की बहुतमाप्रमाणे लोकांच्या मताप्रमाणे सरकार स्थापन होईल.
पण दुर्देवाने तसे झाले नाही. पण आम्ही ते केले तीन महिन्यांपूर्वी.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या या उत्तरावर नाना पाटेकर यांनी प्रश्न विचारला की, रागावू नका पण अडीच वर्ष का लागली?
यावर शिंदे म्हणाले, अडीच वर्ष म्हणजे त्यासाठी योग्य वेळ, काळ पाहिजे ना? मध्ये कोविड होता.
आम्ही जर तिथे काहीतरी करायला गेलो असतो तर कोव्हिड असताना का करताय वगैरे मुद्दे उपस्थित राहिले होते.
आम्ही त्यांना सांगत होतो, समजावण्याचा प्रयत्न सुरु होता. मात्र आम्हाला यश आले नाही.
म्हणून तुमच्या मतांचा आदर आम्ही तीन महिन्यांपूर्वी केला.

 

यावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावताना म्हटले, नाना,
कोव्हिड होता आणि सरकार फेसबुक लाइव्हवर तर बनवता येत नाही.
त्यामुळे जसा कोव्हिड संपला तसे आम्ही एकत्र आलो आणि फिजिकल सरकार बनवले.

 

 

Web Title :- CM Eknath Shinde | cm eknath shinde on why it took 2 and half year to get out from mahavikas agadhi government fadnavis takes dig at uddhav in interview with nana patekar

 

हे देखील वाचा :

Swatantra Veer Savarkar | ‘सावरकर हे भाजपच्या दृष्टीने तोंडी लावायला आणि चघळायचा विषय झाला आहे’

Devendra Fadnavis | नाना पाटेकरांनी विचारला प्रश्न, समान नागरी कायदा येईल का? देवेंद्र फडणवीसांनी दिले स्पष्ट उत्तर

Jayant Patil | भाजपावर जयंत पाटलांचा घणाघात, म्हणाले – भाजप सत्तेविना राहू शकत नाही, पडेल ती किंमत देऊन शिवसेना फोडली

 

Related Posts